म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
उद्योगपती व टाटा उद्योगसमूहाचे नवे अध्यक्ष रतन टाटा आणि माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यातील शाब्दिक युद्धाचा थेट परिणाम म्हणून समूहातील कंपन्यांतून भांडवली गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मागील तीन दिवसांत सुमारे ५१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याला बाजार तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.
पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा व टाटा समूह यांच्याविरोधात पत्रयुद्ध छेडले आहे. यामुळे समूहामध्ये तसेच समूहाबाहेरही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. टाटा समूहातील काही कंपन्या यापूर्वीपासूनच तोट्यात आहेत. त्यांच्या भांडवलात या सर्व प्रकरणामुळे घसरण होत असल्याचे दिसत आहे. या कंपन्यांच्या समभागांची किंमत सातत्याने खाली येत असल्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता हे समभाग विकून यातून बाहेर पडावे, अशी झाली आहे.
आतापर्यंत टाटा कंपन्यांचे समभाग तब्बल ९ टक्के घसरले आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) या कंपनीला सर्वाधिक फटका बसला असून या कंपनीचे समभाग ९.१ टक्के खाली आले आहेत. इंडियन हॉटेल्स ५.४ टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ५ टक्के, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस ४.७ टक्के तर टाटा स्पंज आयर्न ३.६ टक्के घसरला आहे. टाटा मोटर्स, टाटा स्टील व टीसीएस यासारख्या बड्या कंपन्यांची स्थितीही फारशी वेगळी नाही. ट्रेन्ट, नेल्को, ओरिएन्टल हॉटेल्स, रॅलिज इंडिया, टाटा केमिकल्स आदी कंपन्यांचे समभागही ३ ते ७ टक्के घसरले आहेत. मागील सत्रांमध्ये समूहाच्या २७ कंपन्यांमध्ये झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे ५१ हजार कोटी रुपये बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायरस मिस्त्री यांच्या कारकीर्दीत या कंपन्यांचे भांडवल घसरले –
० टाटा कॉफी – १० टक्के
० टाटा स्टील – ७.३३ टक्के
० टाटा ग्लोबल बिव्हरेजेस – १४.१५ टक्के
० टाटा पॉवर – २७.१९ टक्के
० टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) – ३६.१० टक्के
उद्योगपती व टाटा उद्योगसमूहाचे नवे अध्यक्ष रतन टाटा आणि माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यातील शाब्दिक युद्धाचा थेट परिणाम म्हणून समूहातील कंपन्यांतून भांडवली गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे मागील तीन दिवसांत सुमारे ५१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याला बाजार तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे.
पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा व टाटा समूह यांच्याविरोधात पत्रयुद्ध छेडले आहे. यामुळे समूहामध्ये तसेच समूहाबाहेरही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. टाटा समूहातील काही कंपन्या यापूर्वीपासूनच तोट्यात आहेत. त्यांच्या भांडवलात या सर्व प्रकरणामुळे घसरण होत असल्याचे दिसत आहे. या कंपन्यांच्या समभागांची किंमत सातत्याने खाली येत असल्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता हे समभाग विकून यातून बाहेर पडावे, अशी झाली आहे.
आतापर्यंत टाटा कंपन्यांचे समभाग तब्बल ९ टक्के घसरले आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) या कंपनीला सर्वाधिक फटका बसला असून या कंपनीचे समभाग ९.१ टक्के खाली आले आहेत. इंडियन हॉटेल्स ५.४ टक्के, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ५ टक्के, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस ४.७ टक्के तर टाटा स्पंज आयर्न ३.६ टक्के घसरला आहे. टाटा मोटर्स, टाटा स्टील व टीसीएस यासारख्या बड्या कंपन्यांची स्थितीही फारशी वेगळी नाही. ट्रेन्ट, नेल्को, ओरिएन्टल हॉटेल्स, रॅलिज इंडिया, टाटा केमिकल्स आदी कंपन्यांचे समभागही ३ ते ७ टक्के घसरले आहेत. मागील सत्रांमध्ये समूहाच्या २७ कंपन्यांमध्ये झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे ५१ हजार कोटी रुपये बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायरस मिस्त्री यांच्या कारकीर्दीत या कंपन्यांचे भांडवल घसरले –
० टाटा कॉफी – १० टक्के
० टाटा स्टील – ७.३३ टक्के
० टाटा ग्लोबल बिव्हरेजेस – १४.१५ टक्के
० टाटा पॉवर – २७.१९ टक्के
० टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) – ३६.१० टक्के