अ‍ॅपशहर

‘भारत बनेल पहिला एलईडी स्वयंपूर्ण देश’

आगामी दोन वर्षांमध्ये (२०१९पर्यंत) सर्वप्रकारच्या प्रकाशविषयक गरजा भागविण्यासाठी केवळ एलईडी दिव्यांचा वापर करणारा पहिला देश म्हणून भारताची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

Maharashtra Times 19 Aug 2017, 3:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम led country
‘भारत बनेल पहिला एलईडी स्वयंपूर्ण देश’


आगामी दोन वर्षांमध्ये (२०१९पर्यंत) सर्वप्रकारच्या प्रकाशविषयक गरजा भागविण्यासाठी केवळ एलईडी दिव्यांचा वापर करणारा पहिला देश म्हणून भारताची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

एलईडी दिव्यांमुळे ऊर्जेच्या वापरात बचत होऊन दर वर्षी ४० हजार कोटी रुपयांची बचत करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१९चे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे,’ असे गोयल यांनी नमूद केले.

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर वीजबचत करण्यासाठी आतापर्यंत २५.५ कोटी एलईडी बल्ब, ३०.६ लाख एलईडी ट्यूब आणि ११.५ लाख ऊर्जा कार्यक्षम पंख्यांची विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे ३,३४० कोटी किलो वॉट ऊर्जेची बचत करण्यात यश आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ग्राहकांच्या वीजबिलात वार्षिक १३,३४६ कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच, दर वर्षी अंदाजे २.७ कोटी टन कार्बन डाय ऑक्साइडची बचत होण्याचीही शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज