अ‍ॅपशहर

एलआयसीला चिंता नाही

टाटा समूहातील कंपन्यांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) मोठी गुंतवणूक आहे. सायरस मिस्त्री यांच्याकडून रतन टाटा यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांची आपल्याला चिंता वाटत नसल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Times 28 Oct 2016, 3:00 pm
मुंबई ः टाटा समूहातील कंपन्यांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) मोठी गुंतवणूक आहे. सायरस मिस्त्री यांच्याकडून रतन टाटा यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांची आपल्याला चिंता वाटत नसल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lic
एलआयसीला चिंता नाही


टाटा मोटर्समध्ये एलआयसीचा ७ टक्के हिस्सा आहे. याशिवाय टाटा स्टीलमध्ये १३.९१ टक्के, टाटा पॉवरमध्ये १३.१२ टक्के तसेच इंडियन हॉटेल्समध्ये ८.७६ टक्के हिस्सा आहे. टाटा समूहातील टॉप ११ कंपन्यांत एलआयसीची एकूण गुंतवणूक ३५ हजार ६८० कोटी रुपये आहे.

टाटा समूहातील सत्ताबदलामुळे आपल्याला चिंता नाही. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही या समूहातील दीर्घकालीन गुंतवणूकदार आहोत, असे एलआयसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज