म. टा. प्रतिनिधी, पुणे
मार्च २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रला ११३.५१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला ४५५.४५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. या शिवाय आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये वार्षिक आधारावर कार्यगत नफ्यामध्ये (ऑपरेटिंग प्रॉफिट)२० टक्क्यांची वाढ झाली, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि ए. सी. राऊत उपस्थित होते. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेला ५९६.७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळविले होते.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) बँकेला व्याजरूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात १५.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आले असून, ते ८८१.२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१६-१७) बँकेला व्याजाच्या माध्यमातून ७६३.४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तिमाही आधारावर चौथ्या तिमाहीत बँकेचा ढोबळ एनपीए १९.०५ टक्क्यांवरून १९.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच कालावधीत बँकेचा निव्वळ एनपीए १२.१७ टक्क्यांवरून ११.२४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत थकीत कर्जांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीतही वाढ होऊन ती १९९४.६१ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही तरतूद १७४२.७६ कोटी रुपये होती, असेही मराठे यांनी नमूद केले. मार्च २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीत मागील वर्षाच्या कामगिरीच्या तुलनेत बँकेच्या एकूण उत्पन्नात घट नोंदवण्यात आली असून, ते ३०९४.४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्च २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेला २,३५४.८० कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले.
चार लाख शेतकऱ्यांना फायदा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीसाठी चार लाख शेतकरी ग्राहक पात्र ठरले असून त्यापैकी १.९१ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचेही मराठे यांनी स्पष्ट केले. बँकेने कॉर्पोरेट क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये घट केली असून, भविष्यात शेती आणि एमएसईंवर अधिक भर देण्यात येणार असल्याचेही मराठे म्हणाले. मुदतठेवींच्या प्रमाणात झालेली घट पाहता नजीकच्या भविष्यात बँकेतर्फे म्युच्युअल फंड, विमा वितरण क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
मार्च २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रला ११३.५१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला ४५५.४५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. या शिवाय आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये वार्षिक आधारावर कार्यगत नफ्यामध्ये (ऑपरेटिंग प्रॉफिट)२० टक्क्यांची वाढ झाली, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि ए. सी. राऊत उपस्थित होते. डिसेंबर २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेला ५९६.७० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळविले होते.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (२०१७-१८) बँकेला व्याजरूपाने मिळणाऱ्या उत्पन्नात १५.५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आले असून, ते ८८१.२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१६-१७) बँकेला व्याजाच्या माध्यमातून ७६३.४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तिमाही आधारावर चौथ्या तिमाहीत बँकेचा ढोबळ एनपीए १९.०५ टक्क्यांवरून १९.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. याच कालावधीत बँकेचा निव्वळ एनपीए १२.१७ टक्क्यांवरून ११.२४ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.
जानेवारी ते मार्च २०१८ या कालावधीत थकीत कर्जांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीतही वाढ होऊन ती १९९४.६१ कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही तरतूद १७४२.७६ कोटी रुपये होती, असेही मराठे यांनी नमूद केले. मार्च २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीत मागील वर्षाच्या कामगिरीच्या तुलनेत बँकेच्या एकूण उत्पन्नात घट नोंदवण्यात आली असून, ते ३०९४.४६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मार्च २०१७ अखेर संपलेल्या तिमाहीत बँकेला २,३५४.८० कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले.
चार लाख शेतकऱ्यांना फायदा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफीसाठी चार लाख शेतकरी ग्राहक पात्र ठरले असून त्यापैकी १.९१ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचेही मराठे यांनी स्पष्ट केले. बँकेने कॉर्पोरेट क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये घट केली असून, भविष्यात शेती आणि एमएसईंवर अधिक भर देण्यात येणार असल्याचेही मराठे म्हणाले. मुदतठेवींच्या प्रमाणात झालेली घट पाहता नजीकच्या भविष्यात बँकेतर्फे म्युच्युअल फंड, विमा वितरण क्षेत्रावर अधिक लक्ष देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.