नवी दिल्ली ः टाटा मोटर्सच्या संचालक मंडळातून काढून टाकलेले सायरस मिस्त्री व त्यांचे पाठीराखे नसली वाडिया आता टाटा समूहाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहेत. यासाठी त्यांचे म्हणणे घेऊन ते पुन्हा एकदा कंपनीच्या सदस्यांकडे जाणार आहेत.
टाटा मोटर्सने या दोघांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी २२ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वी मिस्त्री व वाडिया यांनी स्वतंत्ररीत्या आपले म्हणणे मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे टाटा मोटर्सने सांगितले आहे. टाटा स्टील व टाटा केमिकल्स यांनीही मिस्त्री व वाडिया यांनी अशी इच्छा प्रदर्शित केल्याचे म्हटले आहे.
टाटा मोटर्सने या दोघांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी २२ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण बैठक बोलावली आहे. मात्र त्यापूर्वी मिस्त्री व वाडिया यांनी स्वतंत्ररीत्या आपले म्हणणे मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे टाटा मोटर्सने सांगितले आहे. टाटा स्टील व टाटा केमिकल्स यांनीही मिस्त्री व वाडिया यांनी अशी इच्छा प्रदर्शित केल्याचे म्हटले आहे.