अ‍ॅपशहर

तिमाही विकासदर आठ टक्क्यांवर

‘चांगला मान्सून, आर्थिक सुधारणा आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी घेण्यात येणारे निर्णय या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षातील आगामी तिमाहींमध्ये आठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठणे सहज शक्य होईल,’ असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी व्यक्त केला.

Maharashtra Times 26 Sep 2016, 3:00 am
नवी दिल्लीः ‘चांगला मान्सून, आर्थिक सुधारणा आणि केंद्र सरकारकडून वेळोवेळी घेण्यात येणारे निर्णय या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षातील आगामी तिमाहींमध्ये आठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठणे सहज शक्य होईल,’ असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी व्यक्त केला. देशभरात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीअखरेही आठ टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर गाठला जाईल, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या आर्थिक नीतींची फळे येत्या काही काळात चाखण्यास मिळतील, असे भाकितही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम niti aayog expects 8 pc growth in gdp
तिमाही विकासदर आठ टक्क्यांवर

एप्रिल ते जून या तिमाहीदरम्यान देशाच्या विकासाचा वेग गेल्या सहा तिमाहींच्या तुलनेत ७.१ टक्के या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. खाणकाम, रिअल इस्टेट आदी क्षेत्रांमधील कामगिरीत झालेली घट विकासदरावर परिणाम करणारी ठरली. यंदा चांगला मान्सून बरसल्याचा परिणाम पहिल्या तिमाहीवर झाल्याचे दिसून आले नाही. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीअखेर विकासदर ७.५ टक्क्यांवर पोहोचला होता.
...
अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होणार?
चालू वर्षाच्या खरीप हंगामात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात ९ टक्क्यांची वाढ होऊन एकूण उत्पादन १३.५० कोटी टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. २०१५-१६च्या खरीप हंगामात अन्नधान्याचे एकूण उत्पादन १२.४० कोटी टनांवर पोहोचले होते. डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरही घटण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज