अ‍ॅपशहर

३९ कंपन्यांवर बंदी

राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) २४ तारखेपासून ३९ कंपन्यांना भांडवल बाजारातील सूचीतून काढून टाकणार आहे.

Maharashtra Times 7 Mar 2017, 12:18 am
मुंबई ः राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) २४ तारखेपासून ३९ कंपन्यांना भांडवल बाजारातील सूचीतून काढून टाकणार आहे. त्यामुळे या कंपन्यांना भांडवल बाजारात कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. यापूर्वी एनएसईने ३० कंपन्यांना सूचीतून काढून टाकून त्यांच्यावर व्यवहारबंदी घातली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nse
३९ कंपन्यांवर बंदी


३९ कंपन्यांना सूचीतून काढून टाकण्याविषयी एनएसईने सोमवारी परिपत्रक जारी केले. या कंपन्यांना इक्विटी शेअर्समध्ये व्यवहार करता येणार नाहीत. सांघी पॉलिएस्टर्स, ब्लूबर्ड इंडिया, बीपीएल इंजीनिअरिंग यासारख्या कंपन्यांवर ही व्यवहारबंदीची कुऱ्हाड कोसळणार आहे. एप्रिल महिन्यात एनएसई ८० कंपन्यांना सूचीतून काढून टाकणार आहे. या सर्व कंपन्यांच्या भागांची खरेदी-विक्री यापूर्वीच थांबवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज