मुंबई : पीएसीएल कंपनीने सुमार सहा कोटी गुंतवणूकदारांकडून तब्बल ६० हजार कोटी रुपये गुंतवणूक घेऊन त्यांना फसवल्याचे उघड झाले आहे. कंपनीने मुंबई, ठाण्यासह ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, दुबई अशा देशांतूनही पीएसीएलना हा पैसा फिरवला आहे. याविरोधात अखिल भारतीय पीएसीएल गुंतवणूकदार संघटनेने आंदोलन छेडले आहे. पीएसीएलच्या सर्व गुंतवणूकदारांनी सेबीच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यांत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील सभा १३ तारखेला शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार असून सभेला कामगार नेता विश्वास उटगी व राजन क्षीरसागर मार्गदर्शन करणार आहेत.
गुंतवणूकदारांची सभा
पीएसीएल कंपनीने सुमार सहा कोटी गुंतवणूकदारांकडून तब्बल ६० हजार कोटी रुपये गुंतवणूक घेऊन त्यांना फसवल्याचे उघड झाले आहे. कंपनीने मुंबई, ठाण्यासह ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, दुबई अशा देशांतूनही पीएसीएलना हा पैसा फिरवला आहे.
Maharashtra Times 12 Sep 2016, 3:00 am