अ‍ॅपशहर

रोजगारावरून देशातील तरुणांमध्ये चिंता: आरबीआय

नोकऱ्या आणि रोजगारावरून देशातील ४७ टक्के लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याची धक्कादायक माहिती आरबीआयच्या एका अहवालातून उघड झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि येत्या १२ महिन्यांत रोजगार आणि नोकऱ्यांबाबतीत सुधारणा होईल, असा विश्वास ५२ टक्के लोकांनी दाखवल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Surojit Gupta | TIMESOFINDIA.COM 16 Dec 2018, 12:49 pm
मुंबई:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ECONOMY


नोकऱ्या आणि रोजगारावरून देशातील ४७ टक्के लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याची धक्कादायक माहिती आरबीआयच्या एका अहवालातून उघड झाली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि येत्या १२ महिन्यांत रोजगार आणि नोकऱ्यांबाबतीत सुधारणा होईल, असा विश्वास ५२ टक्के लोकांनी दाखवल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्सच्या ताज्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील १३ शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. ५ डिसेंबर रोजी हा सर्व्हे जारी करण्यात आला. या सर्व्हेनुसार अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याची भावना असणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याचंही उघड झालं आहे. तर ५३.६ टक्के लोकांना अजूनही या परिस्थितीत सुधारणा होणार असल्याचं या सर्व्हेतून दिसून आलं आहे.

सध्याची अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रात जे काही सुरू आहे. त्यावर लोक नाराजी व्यक्त करत असल्याचं आकड्यांवरून दिसत आहे. बाजार, अर्थव्यवस्था आणि संस्थांमध्ये होणारे सततचे बदल लोकांच्या पचनी पडत नसतात, असं या माजी मुख्य संख्याशास्त्रज्ञ प्रोणब सेन यांनी सांगितलं. तर तेलाच्या घसरत्या किंमती, रुपयाची घसरण आणि त्यामुळे शेअरबाजारात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती यामुळे नोकरी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित चिंता वाढणं स्वाभाविक असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडिया समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
Surojit Gupta

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज