पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना फरार घोषित करावे अशा आशयाची याचिका सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील विशेष न्यायायलात दाखल केली. केंद्र सरकारने जारी केलेल्या फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेशाद्वारे नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना फरार घोषित करावे. यामुळे या दोघांची साडेतीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करणे शक्य होईल, असे ईडीने म्हटले आहे. ईडीने यापूर्वी विजय मल्ल्याविरोधातही याच प्रकारची याचिका दाखल केली आहे.
नीरवविरोधात याचिका
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांना फरार घोषित करावे अशा आशयाची याचिका सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील ...
Maharashtra Times 12 Jul 2018, 4:00 am