नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. पण ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे किंवा हफ्त्यांवर काही वस्तू घेतलेल्या आहेत, अशा लोकांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये कमाईच नसल्यामुळे ईएमआय भरायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने ईएमआय पुढे ढकलावे, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
#EMI हा ट्रेंड ट्विटरवर सुरू होता. ईएमआय रद्द करण्याची मागणी करत नाही, किमान ते पुढे ढकलावे. सध्या प्रत्येक जण घरात आहे, पैसे कमवलेच जात नाहीत, तर ईएमआय भरायचा कसा, असा प्रश्न या ग्राहकांनी उपस्थित केला. आम्ही वर्षभर प्रामाणिकपणे कर भरतो, त्याचा मोबदला म्हणून एवढा दिलासा द्यावा, अशीही मागणी काही कर्जदात्यांनी केली.
येत्या ३१ मार्चपर्यंत बँकांकडून शुल्कमाफी
इतर बँकांच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्यावरील शुल्क आणि बचत खात्यांत किमान शिल्लक न ठेवण्याबद्दल असलेला दंड यात पुढील तीन महिने सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी घोषित केला. ग्राहक बँकेमध्ये येऊ नयेत, यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक बँकांनी कामकाजाच्या वेळा बदलल्या आहेत. ग्राहकांनी नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असेही आवाहन बँकांनी केले आहे. अॅक्सिस बँकेने सर्व प्रकारचे शुल्क ३१ मार्चपर्यंत माफ केले आहे. बँक ऑफ बडोदाने ऑनलाइन पेमेंटवरील शुल्कात कपात केली आहे. स्टेट बँकेनेही अलीकडेच बचत खात्यावरील किमान शुल्क आधीच रद्द केले आहे.
#EMI हा ट्रेंड ट्विटरवर सुरू होता. ईएमआय रद्द करण्याची मागणी करत नाही, किमान ते पुढे ढकलावे. सध्या प्रत्येक जण घरात आहे, पैसे कमवलेच जात नाहीत, तर ईएमआय भरायचा कसा, असा प्रश्न या ग्राहकांनी उपस्थित केला. आम्ही वर्षभर प्रामाणिकपणे कर भरतो, त्याचा मोबदला म्हणून एवढा दिलासा द्यावा, अशीही मागणी काही कर्जदात्यांनी केली.
येत्या ३१ मार्चपर्यंत बँकांकडून शुल्कमाफी
इतर बँकांच्या एटीएम मशिनमधून पैसे काढण्यावरील शुल्क आणि बचत खात्यांत किमान शिल्लक न ठेवण्याबद्दल असलेला दंड यात पुढील तीन महिने सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी घोषित केला. ग्राहक बँकेमध्ये येऊ नयेत, यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक बँकांनी कामकाजाच्या वेळा बदलल्या आहेत. ग्राहकांनी नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असेही आवाहन बँकांनी केले आहे. अॅक्सिस बँकेने सर्व प्रकारचे शुल्क ३१ मार्चपर्यंत माफ केले आहे. बँक ऑफ बडोदाने ऑनलाइन पेमेंटवरील शुल्कात कपात केली आहे. स्टेट बँकेनेही अलीकडेच बचत खात्यावरील किमान शुल्क आधीच रद्द केले आहे.