कोलकाता
आर्थिक नियोजन केल्यास येत्या पाच वर्षांत ५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठणं शक्य आहे, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय. जीएसटीमध्ये अधिक स्पष्टता हवी आहे. तसंच गेल्या वर्षापासून अर्थव्यवस्थेतून मंदीचे संकेत येत आहे. यामुळे आर्थिक विकास दर कमी झालाय, असं मुखर्जी म्हणाले. योग्य वित्त नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून आर्थिक व्यवस्थापन केल्यास ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करणं शक्य आहे. तसंच गुंतवणुकीशिवाय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही, असं प्रणव मुखर्जी म्हणाले. असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट अॅडवायजर्स अॅण्ड एग्झिक्युटिव्ह (एसीएई)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुखर्जी बोलत होते.
जीएसटीचे प्रभावीपणे पालन होण्यासाठी त्यात सरकारकडून अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढते आर्थिक गैरव्यवहार चिंताजनक आहेत. गेल्या काही वर्षांत घोटाळ्यांमध्ये मोठी वाढ झालीय, असं मुखर्जी म्हणाले.
आर्थिक नियोजन केल्यास येत्या पाच वर्षांत ५ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठणं शक्य आहे, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय. जीएसटीमध्ये अधिक स्पष्टता हवी आहे. तसंच गेल्या वर्षापासून अर्थव्यवस्थेतून मंदीचे संकेत येत आहे. यामुळे आर्थिक विकास दर कमी झालाय, असं मुखर्जी म्हणाले.
जीएसटीचे प्रभावीपणे पालन होण्यासाठी त्यात सरकारकडून अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढते आर्थिक गैरव्यवहार चिंताजनक आहेत. गेल्या काही वर्षांत घोटाळ्यांमध्ये मोठी वाढ झालीय, असं मुखर्जी म्हणाले.