ईटी वृत्त, मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटी रुपयांच्या कर्जघोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्या दोन मालमत्ता विकून सुमारे २,४०० कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) सुरू केला आहे. येथील विशेष न्यायालयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्याने ही वसुली करण्याबाबतच्या ईडीच्या आशा उंचावल्या आहेत. या प्रकरणी १० जानेवारीला सुनावणी होणार आहे.
द स्पेशल प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग अॅक्ट न्यायालयाने गेल्या आठवड्यात नीरवला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. यामुळे नीरवची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करण्याचा अधिकार या न्यायालयास व ईडीला मिळाला आहे. त्यानुसार नीरवच्या दोन मालमत्तांचा लिलाव करण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा येथील ऱ्हीदम हाऊस व वरळी येथील निवासस्थान अशा या दोन मालमत्ता असून त्यांच्या लिलावातून २,४०० कोटी रुपये जमा होतील, अशी ईडीला आशा आहे. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या बुडीत कर्जखात्यात वर्ग होण्याची शक्यता असून त्यामुळे बँकेच्या एनपीएमध्येही (अनुत्पादित मालमत्ता) घट होईल.
पुढील वर्षी प्रत्यार्पण
नीरव मोदीला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आले असून त्याच्यावर लंडन न्यायालयात खटला सुरू आहे. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन आणखी पाच ते सहा महिन्यांमध्ये त्याला भारताच्या हवाली केले जाईल, अशी शक्यता आहे.
द स्पेशल प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग अॅक्ट न्यायालयाने गेल्या आठवड्यात नीरवला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. यामुळे नीरवची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करण्याचा अधिकार या न्यायालयास व ईडीला मिळाला आहे. त्यानुसार नीरवच्या दोन मालमत्तांचा लिलाव करण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. दक्षिण मुंबईतील काळा घोडा येथील ऱ्हीदम हाऊस व वरळी येथील निवासस्थान अशा या दोन मालमत्ता असून त्यांच्या लिलावातून २,४०० कोटी रुपये जमा होतील, अशी ईडीला आशा आहे. ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या बुडीत कर्जखात्यात वर्ग होण्याची शक्यता असून त्यामुळे बँकेच्या एनपीएमध्येही (अनुत्पादित मालमत्ता) घट होईल.
पुढील वर्षी प्रत्यार्पण
नीरव मोदीला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आले असून त्याच्यावर लंडन न्यायालयात खटला सुरू आहे. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून ही प्रक्रिया पूर्ण होऊन आणखी पाच ते सहा महिन्यांमध्ये त्याला भारताच्या हवाली केले जाईल, अशी शक्यता आहे.