म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
दुकानांत ‘पॉइंट ऑफ सेल्स’ अर्थात ‘पॉस’ यंत्र बसवून कार्ड व्यवहारांना चालना देण्यापेक्षा दुकानदार मोबाइल वॉलेट कंपन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देऊ लागले आहेत. इंटरनेटचा वापर विशेष न येणाऱ्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना मोबाइल वॉलेट वरदान ठरत आहे. मोबाइल वॉलेट सेवेचा वापर करण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ला अर्थात ‘क्यूआर कोड’ला वाढती पसंती मिळत असल्याचे निरीक्षण पेटीएम या देशातील सर्वात मोठ्या मोबाइल पेमेंट कंपनीने मंगळवारी येथे नोंदवले. देशाच्या पश्चिम भागात पेटीएम वापरणारे सहा लाखांहून अधिक व्यापारी व दुकानदार झाल्याचे पेटीएमचे सहयोगी उपाध्यक्ष रिपुंजाई गौर यांनी सांगितले.
पेटीएमच्या विस्ताराविषयी समाधान व्यक्त करून रिपुंजाई गौर म्हणाले, ‘नोटाबंदीपूर्वी व नोटाबंदीनंतर अशा दोन वेगळ्या स्थिती मोबाइल पेमेंटच्या बाबतीत ठळकपणे पाहायला मिळत आहेत. नोटाबंदीपूर्वी डिजिटल पेमेंट किंवा मोबाइल पेमेंटविषयी लोकांमध्ये जागरुकता होती. परंतु लोक स्वतःहून तितक्या उत्साहाने मोबाइल पेमेंट स्वीकारत नव्हते. नोटाबंदी मोहिमेच्या काळात डिजिटल पेमेंट काहीसे अनिवार्य करण्यात आल्यामुळे, लोकांनी मोबाइल पेमेंटचा स्वीकार केला. आता याविषयीची जागरुकता कमालीची वाढली आहे. त्यामुळेच पेटीएमचे कामकाज देशातील २२५ शहरांतून सुरू झाले असून देशभरात ५० लाख दुकानदारांनी पसंती दिली आहे.’
दुकानदारांचाही कल मोबाइल पेमेंटकडे वाढतो आहे. पॉस यंत्र दुकानात बसवणे, त्याचे भाडे भरणे, त्याचा वापर करून एखाद्या ग्राहकाने पेमेंट केल्यास त्याच्या कमिशनचा प्रश्न, पॉस यंत्राची देखभाल अशा अनेक गोष्टींमुळे पॉस यंत्राऐवजी मोबाइल पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याकडे कल वाढतो आहे. पॉस यंत्राऐवजी क्यूआर कोड दुकानात लावून त्याद्वारे ग्राहकाकडून पेमेंट स्वीकारणे अधिक सोपे व सुरक्षित आहे, असे दुकानदारांचे म्हणणे असल्याचा दावाही रिपुंजाई गौर यांनी केला.
दुकानांत ‘पॉइंट ऑफ सेल्स’ अर्थात ‘पॉस’ यंत्र बसवून कार्ड व्यवहारांना चालना देण्यापेक्षा दुकानदार मोबाइल वॉलेट कंपन्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देऊ लागले आहेत. इंटरनेटचा वापर विशेष न येणाऱ्या दुकानदारांना, व्यापाऱ्यांना मोबाइल वॉलेट वरदान ठरत आहे. मोबाइल वॉलेट सेवेचा वापर करण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ला अर्थात ‘क्यूआर कोड’ला वाढती पसंती मिळत असल्याचे निरीक्षण पेटीएम या देशातील सर्वात मोठ्या मोबाइल पेमेंट कंपनीने मंगळवारी येथे नोंदवले. देशाच्या पश्चिम भागात पेटीएम वापरणारे सहा लाखांहून अधिक व्यापारी व दुकानदार झाल्याचे पेटीएमचे सहयोगी उपाध्यक्ष रिपुंजाई गौर यांनी सांगितले.
पेटीएमच्या विस्ताराविषयी समाधान व्यक्त करून रिपुंजाई गौर म्हणाले, ‘नोटाबंदीपूर्वी व नोटाबंदीनंतर अशा दोन वेगळ्या स्थिती मोबाइल पेमेंटच्या बाबतीत ठळकपणे पाहायला मिळत आहेत. नोटाबंदीपूर्वी डिजिटल पेमेंट किंवा मोबाइल पेमेंटविषयी लोकांमध्ये जागरुकता होती. परंतु लोक स्वतःहून तितक्या उत्साहाने मोबाइल पेमेंट स्वीकारत नव्हते. नोटाबंदी मोहिमेच्या काळात डिजिटल पेमेंट काहीसे अनिवार्य करण्यात आल्यामुळे, लोकांनी मोबाइल पेमेंटचा स्वीकार केला. आता याविषयीची जागरुकता कमालीची वाढली आहे. त्यामुळेच पेटीएमचे कामकाज देशातील २२५ शहरांतून सुरू झाले असून देशभरात ५० लाख दुकानदारांनी पसंती दिली आहे.’
दुकानदारांचाही कल मोबाइल पेमेंटकडे वाढतो आहे. पॉस यंत्र दुकानात बसवणे, त्याचे भाडे भरणे, त्याचा वापर करून एखाद्या ग्राहकाने पेमेंट केल्यास त्याच्या कमिशनचा प्रश्न, पॉस यंत्राची देखभाल अशा अनेक गोष्टींमुळे पॉस यंत्राऐवजी मोबाइल पेमेंटचा पर्याय स्वीकारण्याकडे कल वाढतो आहे. पॉस यंत्राऐवजी क्यूआर कोड दुकानात लावून त्याद्वारे ग्राहकाकडून पेमेंट स्वीकारणे अधिक सोपे व सुरक्षित आहे, असे दुकानदारांचे म्हणणे असल्याचा दावाही रिपुंजाई गौर यांनी केला.