ईटी वृत्त, नवी दिल्ली
भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी उत्पन्न नोंदवले गेले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने १.६८ लाख कोटी रुपये उत्पन्न नोंदवले आहे. माहवाहतूक आणि प्रवासी यांच्यावर लक्ष केंद्रित करून या दोन्ही महत्त्वाच्या घटकांसाठी विविध योजना राबवल्यामुळे रेल्वेला हे चांगले दिवस दिसले आहेत.
३१ मार्च रोजी संपलेल्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने १.०९४ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्षात १.१०७ अब्ज टन मालाची वाहतूक केली गेली आहे. २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आता १.२ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य असेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. २०१६-१७च्या सुरुवातीला रेल्वेची मालवाहतूक आणि प्रवासीसंख्या यांच्यात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू होती. त्यामुळे रेल्वे गाळात जाणार की काय, अशीही चर्चा सुरू झाली होती.
रेल्वे बोर्डाचे सदस्य महम्मद जमशेद यांच्या मते, गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेला २० दशलक्ष टन कोळशाच्या व्यवसायाचा तोटा झाला होता. परंतु हा तोटा पोलादनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची १३७ दशलक्ष टनांची वाहतूक करून भरून काढण्यात आला.
उत्पन्नाची वैशिष्ट्ये –
- गेल्यावर्षी (२०१५-१६) प्रवासी भाड्यातून रेल्वेला दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी (२०१६-१७) मात्र त्यात घसघशीत वाढ होऊन ४८ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
- गेल्यावर्षीच्या मालवाहतुकीतून मिळालेल्या १.०४ लाख कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा १.०९ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
- भंगार, जाहिरातींचे हक्क विकून तसेच अन्य स्रोतांपासून रेल्वेला ११ हजार कोटी रुपये उत्पन्नाचा लाभ झाला.
- उत्पन्नवाढीसाठी खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांमागे उत्पन्नाचे प्रमाणा ९५ टक्के आहे. २०१५-१६मध्ये हे प्रमाण ९४ टक्के होते.
‘आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली आहे. मागणी मंदावत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्वरित पावले उचलली गेली, काही धोरणे आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली गेली. यामुळे रेल्वे पुन्हा रुळांवर आली!’
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री
२०१६-१७ मध्ये रेल्वेची कमाई
प्रवासी भाडे उत्पन्न ४८ हजार कोटी रु.
मालवाहतुकीचे उत्पन्न १.०९ लाख कोटी रु.
अन्य उत्पन्न ११ हजार कोटी रु.
मालाची वाहतूक १.१०७ अब्ज टन
कामकाजाचे प्रमाण ९५ टक्के
एकूण उत्पन्न १.६८ लाख कोटी रु.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच विक्रमी उत्पन्न नोंदवले गेले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने १.६८ लाख कोटी रुपये उत्पन्न नोंदवले आहे. माहवाहतूक आणि प्रवासी यांच्यावर लक्ष केंद्रित करून या दोन्ही महत्त्वाच्या घटकांसाठी विविध योजना राबवल्यामुळे रेल्वेला हे चांगले दिवस दिसले आहेत.
३१ मार्च रोजी संपलेल्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेने १.०९४ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्षात १.१०७ अब्ज टन मालाची वाहतूक केली गेली आहे. २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आता १.२ अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य असेल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. २०१६-१७च्या सुरुवातीला रेल्वेची मालवाहतूक आणि प्रवासीसंख्या यांच्यात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू होती. त्यामुळे रेल्वे गाळात जाणार की काय, अशीही चर्चा सुरू झाली होती.
रेल्वे बोर्डाचे सदस्य महम्मद जमशेद यांच्या मते, गेल्या आर्थिक वर्षात रेल्वेला २० दशलक्ष टन कोळशाच्या व्यवसायाचा तोटा झाला होता. परंतु हा तोटा पोलादनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची १३७ दशलक्ष टनांची वाहतूक करून भरून काढण्यात आला.
उत्पन्नाची वैशिष्ट्ये –
- गेल्यावर्षी (२०१५-१६) प्रवासी भाड्यातून रेल्वेला दोन हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी (२०१६-१७) मात्र त्यात घसघशीत वाढ होऊन ४८ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
- गेल्यावर्षीच्या मालवाहतुकीतून मिळालेल्या १.०४ लाख कोटी रुपये उत्पन्नाच्या तुलनेत यंदा १.०९ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
- भंगार, जाहिरातींचे हक्क विकून तसेच अन्य स्रोतांपासून रेल्वेला ११ हजार कोटी रुपये उत्पन्नाचा लाभ झाला.
- उत्पन्नवाढीसाठी खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांमागे उत्पन्नाचे प्रमाणा ९५ टक्के आहे. २०१५-१६मध्ये हे प्रमाण ९४ टक्के होते.
‘आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली आहे. मागणी मंदावत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्वरित पावले उचलली गेली, काही धोरणे आखून त्यांची तातडीने अंमलबजावणी केली गेली. यामुळे रेल्वे पुन्हा रुळांवर आली!’
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री
२०१६-१७ मध्ये रेल्वेची कमाई
प्रवासी भाडे उत्पन्न ४८ हजार कोटी रु.
मालवाहतुकीचे उत्पन्न १.०९ लाख कोटी रु.
अन्य उत्पन्न ११ हजार कोटी रु.
मालाची वाहतूक १.१०७ अब्ज टन
कामकाजाचे प्रमाण ९५ टक्के
एकूण उत्पन्न १.६८ लाख कोटी रु.