नवी दिल्ली:
सणासुदीच्या कालावधीत देशभरातील रेल्वेप्रवाशांची वाढती गरज ओळखून विविध रेल्वेगाड्यांत मिळून १६ कोटी आसने उपलब्ध करून देण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत नव्या गाड्या सुरू झाल्यामुळे तसेच, त्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असल्यामुळे आसनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उत्सवी काळात विशेष ४१ ट्रेनच्या ४४९ फेऱ्या होणार असून, १९ गाड्यांची वारंवारिता वाढविण्यात आल्याने त्यांच्याही १३६ अतिरिक्त खेपा होणार आहेत. सणासुदीच्या काळात सर्वाधिक गर्दी नवी दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना असते, हे लक्षात घेऊन उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त १० रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेच्या वेळी अतिरिक्त गाड्या चालवणे यामुळे शक्य होईल.
१० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत १७ गाड्यांच्या माध्यमातून रेल्वेच्या ९४२ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांमध्ये नेहमीपेक्षा ६२ हजार आसने अधिक उपलब्ध होणार आहेत. रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवाळी आणि छट पूजेदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी पाहता अतिरिक्त गाड्या आणि कोच उपलब्ध करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाची नुकतीच उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या विविध भागांतील रेल्वेगाड्यांचा आढावा घेऊन उपलब्ध आसनांची संख्या स्पष्ट केली. त्यानुसार उत्सवी काळात १६ कोटी आसने उपलब्ध होणार आहेत. या गाड्या नवी दिल्ली व्यतिरिक्त चेन्नई, बेंगळुरू, जालंधर, सुरत, चंडीगड या शहरांपासून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत चालवल्या जाणार आहेत.
सणासुदीच्या कालावधीत देशभरातील रेल्वेप्रवाशांची वाढती गरज ओळखून विविध रेल्वेगाड्यांत मिळून १६ कोटी आसने उपलब्ध करून देण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत नव्या गाड्या सुरू झाल्यामुळे तसेच, त्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असल्यामुळे आसनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उत्सवी काळात विशेष ४१ ट्रेनच्या ४४९ फेऱ्या होणार असून, १९ गाड्यांची वारंवारिता वाढविण्यात आल्याने त्यांच्याही १३६ अतिरिक्त खेपा होणार आहेत. सणासुदीच्या काळात सर्वाधिक गर्दी नवी दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना असते, हे लक्षात घेऊन उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त १० रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजेच्या वेळी अतिरिक्त गाड्या चालवणे यामुळे शक्य होईल.
१० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत १७ गाड्यांच्या माध्यमातून रेल्वेच्या ९४२ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. या गाड्यांमध्ये नेहमीपेक्षा ६२ हजार आसने अधिक उपलब्ध होणार आहेत. रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवाळी आणि छट पूजेदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी पाहता अतिरिक्त गाड्या आणि कोच उपलब्ध करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाची नुकतीच उच्चस्तरिय बैठक झाली. या बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या विविध भागांतील रेल्वेगाड्यांचा आढावा घेऊन उपलब्ध आसनांची संख्या स्पष्ट केली. त्यानुसार उत्सवी काळात १६ कोटी आसने उपलब्ध होणार आहेत. या गाड्या नवी दिल्ली व्यतिरिक्त चेन्नई, बेंगळुरू, जालंधर, सुरत, चंडीगड या शहरांपासून उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत चालवल्या जाणार आहेत.