मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पाला काही दिवसच उरले असताना, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बाजारात मागणी वाढवण्यासाठी अधिक रचनात्मक सुधारणा हव्यात तसेच आणखी राजकोषीय (फिस्कल) उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, की नाणिक धोरणाला काहीएक मर्यादा आहेत. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. या सुधारणा करताना अन्नप्रक्रिया उद्योग, पर्यटन, ई-कॉमर्स व स्टार्टअप्स या क्षेत्रांचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे, याकडेही दास यांनी लक्ष वेधले आहे.
याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, की नाणिक धोरणाला काहीएक मर्यादा आहेत. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. या सुधारणा करताना अन्नप्रक्रिया उद्योग, पर्यटन, ई-कॉमर्स व स्टार्टअप्स या क्षेत्रांचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे, याकडेही दास यांनी लक्ष वेधले आहे.