वृत्तसंस्था, मुंबई महागाई दराचा दबाव बाजारपेठेवर असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी आपल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. देशात मान्सून चांगला झाल्यास आगामी काळातील पतधोरण आढाव्यांमध्ये रेपो दरकपात केली जाईल, असे संकेत आरबीआय गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिले.
आरबीआयने रेपो दर ६.५० टक्के तर कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) ४ टक्के कायम ठेवले आहेत. यापूर्वी केलेल्या दरकपातीचा फायदा देशातील बँकांनी अद्याप पूर्णपणे ग्राहकांना दिलेला नाही, अशी खंत व्यक्त करत डॉ. राजन यांनी दरकपातीचा फायदा बँकांनी संपूर्णतः ग्राहकांना द्यावा यावर भर दिला. अर्थव्यवस्थेचा आढावा राजन यांनी यावेळी घेतला. सर्वसमावेशक आर्थिक विकास, चलनवाढ आणि बुडित कर्जे या बाबतीत आपण अद्याप परिपक्व नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चलनवाढ अर्थात महागाई दर मार्च २०१७पर्यंत ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगला पाऊस, समान पर्जन्यमान, पुरवठ्याचे यशस्वी व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) ट्रेडिंग पोर्टल सुरू झाल्याखेरीज अन्नधान्य महागाई दर ५ टक्क्यांवर आणणे अवघड जाईल, असेही राजन म्हणाले.
डॉ. राजन यांनी सादर केलेला हा शेवटचा पतधोरण आढावा होता. यापुढील आढावा पतधोरण समितीतर्फे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. .. ताळेबंद सफाई
सरकारी बँकांचे आर्थिक ताळेबंद स्वच्छ करण्यासाठी सरकार व आरबीआय एकत्रित प्रयत्न करत आहेत. यासाठी भांडवल बाजार नियंत्रक सेबीबरोबरही चर्चा केली जात आहे. बुडित कर्जांची पुनर्रचना करताना कोणत्या निधीमध्ये गुंतवणूक करता येईल, याचीही चाचपणी केली जात असल्याचे गव्हर्नर म्हणाले.
सरकारी अपेक्षांनुसार पतधोरण आढावा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी सादर केलेला पतधोरण आढावा सरकारच्या अपेक्षांनुसार असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. जीडीपीची वाढ व महागाई दर या दोन्ही गोष्टींना आढाव्यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. देशांतर्गत प्रगतीसाठी वातावरण हळूहळू पोषक होत आहे. मान्सून नेहमीप्रमाणे झाल्यास हे वातावरण आणखी पोषक होईल, असा विश्वास आरबीआयने आपल्या आढाव्यादरम्यान व्यक्त केला आहे. रेपो दरात तसेच अन्य दरांमध्ये आरबीआयने बदल केलेला नाही. ..
बाजारातील कल पाहूनच आरबीआयने हा दरकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा संतुलित असून आरबीआयने ठरवलेला ५ टक्के महागाई दर जानेवारी २०१७पर्यंत गाठला जाईल असे वाटते.
अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, एसबीआय
दरकपातीवर आरबीआयने भर देणे गरजेचे होते. त्याऐवजी दरकपातीचा लाभ म्हणून बँकांनी कर्जेच्छुंना कमी व्याजदराने कर्जे देण्यावर आरबीआयने भर दिला आहे.
चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय
आरबीआयचा हा सावध पवित्रा आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये दरकपातीची शक्यता आहे.
राणा कपूर, सीईओ, येस बँक
आरबीआयने रेपो दर ६.५० टक्के तर कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) ४ टक्के कायम ठेवले आहेत. यापूर्वी केलेल्या दरकपातीचा फायदा देशातील बँकांनी अद्याप पूर्णपणे ग्राहकांना दिलेला नाही, अशी खंत व्यक्त करत डॉ. राजन यांनी दरकपातीचा फायदा बँकांनी संपूर्णतः ग्राहकांना द्यावा यावर भर दिला. अर्थव्यवस्थेचा आढावा राजन यांनी यावेळी घेतला. सर्वसमावेशक आर्थिक विकास, चलनवाढ आणि बुडित कर्जे या बाबतीत आपण अद्याप परिपक्व नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चलनवाढ अर्थात महागाई दर मार्च २०१७पर्यंत ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगला पाऊस, समान पर्जन्यमान, पुरवठ्याचे यशस्वी व्यवस्थापन आणि इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट (ई-नाम) ट्रेडिंग पोर्टल सुरू झाल्याखेरीज अन्नधान्य महागाई दर ५ टक्क्यांवर आणणे अवघड जाईल, असेही राजन म्हणाले.
डॉ. राजन यांनी सादर केलेला हा शेवटचा पतधोरण आढावा होता. यापुढील आढावा पतधोरण समितीतर्फे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. .. ताळेबंद सफाई
सरकारी बँकांचे आर्थिक ताळेबंद स्वच्छ करण्यासाठी सरकार व आरबीआय एकत्रित प्रयत्न करत आहेत. यासाठी भांडवल बाजार नियंत्रक सेबीबरोबरही चर्चा केली जात आहे. बुडित कर्जांची पुनर्रचना करताना कोणत्या निधीमध्ये गुंतवणूक करता येईल, याचीही चाचपणी केली जात असल्याचे गव्हर्नर म्हणाले.
सरकारी अपेक्षांनुसार पतधोरण आढावा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी सादर केलेला पतधोरण आढावा सरकारच्या अपेक्षांनुसार असल्याचे आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. जीडीपीची वाढ व महागाई दर या दोन्ही गोष्टींना आढाव्यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. देशांतर्गत प्रगतीसाठी वातावरण हळूहळू पोषक होत आहे. मान्सून नेहमीप्रमाणे झाल्यास हे वातावरण आणखी पोषक होईल, असा विश्वास आरबीआयने आपल्या आढाव्यादरम्यान व्यक्त केला आहे. रेपो दरात तसेच अन्य दरांमध्ये आरबीआयने बदल केलेला नाही. ..
बाजारातील कल पाहूनच आरबीआयने हा दरकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. आढावा संतुलित असून आरबीआयने ठरवलेला ५ टक्के महागाई दर जानेवारी २०१७पर्यंत गाठला जाईल असे वाटते.
अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, एसबीआय
दरकपातीवर आरबीआयने भर देणे गरजेचे होते. त्याऐवजी दरकपातीचा लाभ म्हणून बँकांनी कर्जेच्छुंना कमी व्याजदराने कर्जे देण्यावर आरबीआयने भर दिला आहे.
चंद्रजित बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय
आरबीआयचा हा सावध पवित्रा आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये दरकपातीची शक्यता आहे.
राणा कपूर, सीईओ, येस बँक