मुंबई : करोना रुग्णवाढीत झालेली वाढ आर्थिक विकासाच्या वाढीत अडथळा ठरेल. नव्याने घातलेले निर्बंध विकासाला मार्क ठरतील, अशी भीती व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने आज पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवले. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता होती मात्र तूर्त व्याजदर जैसे थेच ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
सोने झळाळले ; करोनाची धास्ती, सोने आणि चांदीच्या किमतीत झाली मोठी वाढ
आज बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये Cash Reserve Ratio (CRR) ३.३५ टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक संधी; मायक्रोटेक डेव्हलपर्सचा आयपीओ बुधवारपासून खुला होणार
यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढाव्यात बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर ५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षात भारताचा विकास दर १०. ५ टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले.
महागाई वाढीवर देखील आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर ५ टक्के राहील तर २०२१-२२ च्या पहिल्या समाहित विकास दर ४.४ टक्के राहील तर तिसऱ्या तिमाहीत तो ५.१ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. विकासाला चालना देण्याच्या उपायोजना बँकेकडून केल्या जातील आणि तसे पतधोरण असेल, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोने झळाळले ; करोनाची धास्ती, सोने आणि चांदीच्या किमतीत झाली मोठी वाढ
आज बुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये Cash Reserve Ratio (CRR) ३.३५ टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक संधी; मायक्रोटेक डेव्हलपर्सचा आयपीओ बुधवारपासून खुला होणार
यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढाव्यात बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर ५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षात भारताचा विकास दर १०. ५ टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार १४३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ४४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले.
महागाई वाढीवर देखील आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. २०२१ च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर ५ टक्के राहील तर २०२१-२२ च्या पहिल्या समाहित विकास दर ४.४ टक्के राहील तर तिसऱ्या तिमाहीत तो ५.१ टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. विकासाला चालना देण्याच्या उपायोजना बँकेकडून केल्या जातील आणि तसे पतधोरण असेल, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.