अ‍ॅपशहर

व्याजदरकपातीची आशा धूसर

भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर मंगळवारी बावीस महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर जैसे थे ठेवण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Times 14 Jul 2016, 2:00 am
महागाईचा परिणाम; ९ ऑगस्टला आढावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rbi unlikely to cut rates
व्याजदरकपातीची आशा धूसर


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर मंगळवारी बावीस महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर जैसे थे ठेवण्याची दाट शक्यता आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत फळे, भाजीपाल्याचे दर भरमसाठ भिडल्यामुळे किरकोळ महागाईचा दर जूनअखेर ५.७७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे जूनमध्येही महागाईवर नियंत्रण मिळविण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीत १४.४७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये भाजीपाल्याची भाववाढ १०.७७ टक्क्यांवर पोहोचली होती. मे महिन्यात ७.४७ टक्क्यांवर असणारी खाद्यपदार्थांची भाववाढ जूनअखेर ७.७९ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. साखर, डाळी आणि भाजीपाल्याच्या दरात दोन अंकी वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेसमोरचा पेच वाढला असून, पुढील महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या पतधोरण आढाव्यात व्याजदर कमी करण्याची शक्यता धूसर बनली आहे.

मार्च २०१७पर्यंत महागाईचा दर ५ टक्क्यांच्या आत राखण्याचे उद्दिष्ट बँकेने निर्धारित केले आहे. ‘मार्च २०१७पर्यंत महागाई दराच्या उद्दिष्टाची पूर्ती करणे रिझर्व्ह बँकेला शक्य होईल, असे वाटत नाही,’ असे मत ‘कॅपिटल इकॉनॉमिक्स’च्या शिलन शाह यांनी व्यक्त केले. .. राजन यांचे शेवटचे पतधोरण आगामी द्वैमासिक पतधोरण आढावा ९ ऑगस्ट रोजी मांडण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. रघुराम राजन यांचे हे शेवटचे पतधोरण ठरणार आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी डॉ. राजन यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात दीड टक्क्यांची घट केली आहे. सध्या रेपो दर साडेसहा टक्के आहे.

नवे गव्हर्नर १८ जुलैपूर्वी ठरणार? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या गव्हर्नरांचे नाव १८ जुलैपूर्वी जाहीर करण्याची शक्यता आहे. या शिवाय केंद्र सरकारतर्फे पतधोरण समितीचीही नेमणूक करणार आहे. या समितीमध्ये सहा जणांचा समावेश करण्यात येणार असून, समिती ऑगस्टमध्ये मांडण्यात येणाऱ्या पतधोरणाची निर्मिती करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज