अ‍ॅपशहर

रिलायन्सचा 'जिओ फोन' लाँच; किंमत ० रुपया

गेल्या वर्षी 'जिओ'चा नारा देत मोबाइल इंटरनेट विश्वात क्रांती करणाऱ्या रिलायन्सनं आज आपल्या बहुचर्चित ४जी फीचर फोनची घोषणा केली आहे. हा फोन ग्राहकांना 'चकटफू' मिळणार असल्याचं रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं आहे.

Maharashtra Times 21 Jul 2017, 1:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reliance launches jio phone at an effective price of rs 0
रिलायन्सचा 'जिओ फोन' लाँच; किंमत ० रुपया


'हवं तेवढं फुकट बोला, हवे तेवढे एसएमएस फुकट करा आणि इंटरनेटही फुकट वापरा', अशी 'जिओ ऑफर' देऊन गेल्या वर्षी मोबाइल विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्सनं आज मोफत 'जिओ फोन'ची घोषणा करून ग्राहकांना सुखद धक्का आणि प्रतिस्पर्ध्यांना 'जोर का झटका' दिला आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी हा फीचर फोन लाँच केला.

येत्या १५ ऑगस्टपासून जिओ फोनची चाचणी सुरू होणार असून २४ ऑगस्टपासून जिओ फोन बुक करता येणार आहे. त्यासाठी १५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. पण, तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ही रक्कम ग्राहक हवी तेव्हा परत घेऊ शकतात, असं मुकेश अंबानी यांनी जाहीर केलं. या जिओ फोनवर १५३ रुपयांत जिओ अनलिमिटेड धनधनाधन प्लॅन उपलब्ध असेल, तर जिओ ग्राहकांसाठी व्हॉइस कॉलिंग कायमच मोफत राहणार असल्याची खुशखबरही अंबानी यांनी दिली. ५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे.

हा फोन पूर्णपणे 'मेड इन इंडिया' असून त्याचं वर्णन रिलायन्सनं 'इंडिया का इंटेलिजन्ट फोन' असं केलं आहे.

Reliance launches #JioPhone at an effective price of Rs 0#RILAGM2017 pic.twitter.com/nt05CL1uSN — Gadgets Now (@gadgetsnow) July 21, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज