अ‍ॅपशहर

टाटा-मिस्त्री वादात सेबीची उडी

रतन टाटा व सायरस मिस्त्री यांच्यात सुरू झालेल्या आरोपयुद्धात आता भांडवल बाजार नियंत्रक सेबीने उडी घेतली आहे. टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या संपूर्ण प्रकरणात कॉर्पोरेट प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे किंवा काय यावर सेबी लक्ष ठेवून आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 3:00 am
नवी दिल्ली: रतन टाटा व सायरस मिस्त्री यांच्यात सुरू झालेल्या आरोपयुद्धात आता भांडवल बाजार नियंत्रक सेबीने उडी घेतली आहे. टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या संपूर्ण प्रकरणात कॉर्पोरेट प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे किंवा काय यावर सेबी लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे भांडवल बाजारात या समूहातील कंपन्यांकडून नोंदणीविषयक नियमांचे पालन केले गेले आहे ना, याचीही शहानिशा सेबी करणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sebi keeping watch
टाटा-मिस्त्री वादात सेबीची उडी


यासंदर्भात कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब कारवाई केली जाईल, असे सेबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सायरस मिस्त्री यांनी संचालक मंडळाच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात केलेल्या आरोपांची सत्यताही सेबी पडताळून पहात आहे.

टाटा समूहाच्या सुमारे २४ कंपन्या भांडवल बाजारात नोंदणीकृत आहेत. टाटा-मिस्त्री प्रकरणानंतर त्यांच्या समभागांच्या किमतीत कशा प्रकारे बदल होत आहेत यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज