वृत्तसंस्था, नवी दिल्ली
परदेशी गुंतवणूकदारांच्या (एफपीआय) मनावर दाटलेले भीतीचे सावट चालू महिन्यात अधिकाधिक गडद होताना दिसत आहे. रुपयाचे अवमूल्यन, तेलाच्या किंमती व अमेरिकी-चीनमधील व्यापारयुद्धाचा धसका घेतलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात आतापर्यंत तब्बल ३५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. हा ओघ चालू महिन्यात वाढला असून या गुंतवणूकदारांनी विक्रमी रक्कम काढून घेतली आहे. हा आकडा २६ ऑक्टोबरपर्यंतचा असून यामध्ये २४,१८६ कोटी रुपये इक्विटी तर, ११,४०७ कोटी रुपयांच्या रोख्यांचा समावेश आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ९७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेली असून ऑक्टोबरमधील हे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या नव्या गुंतवणुकीचे प्रमाण अत्यल्प असून जुलै ते ऑगस्ट या कालावधीत केवळ ७,४०० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य येईपर्यंत तसेच, भारतीय शेअर बाजार पुन्हा वधारेपर्यंत हे सत्र कायम राहील, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तिवला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांच्या (एफपीआय) मनावर दाटलेले भीतीचे सावट चालू महिन्यात अधिकाधिक गडद होताना दिसत आहे. रुपयाचे अवमूल्यन, तेलाच्या किंमती व अमेरिकी-चीनमधील व्यापारयुद्धाचा धसका घेतलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी चालू महिन्यात आतापर्यंत तब्बल ३५,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेल्याचे स्पष्ट झाले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. हा ओघ चालू महिन्यात वाढला असून या गुंतवणूकदारांनी विक्रमी रक्कम काढून घेतली आहे. हा आकडा २६ ऑक्टोबरपर्यंतचा असून यामध्ये २४,१८६ कोटी रुपये इक्विटी तर, ११,४०७ कोटी रुपयांच्या रोख्यांचा समावेश आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ९७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक माघारी नेली असून ऑक्टोबरमधील हे प्रमाण सर्वाधिक ठरले आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या नव्या गुंतवणुकीचे प्रमाण अत्यल्प असून जुलै ते ऑगस्ट या कालावधीत केवळ ७,४०० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य येईपर्यंत तसेच, भारतीय शेअर बाजार पुन्हा वधारेपर्यंत हे सत्र कायम राहील, असा अंदाज विश्लेषकांनी वर्तिवला आहे.