'सिस्का'च्या अहवालातील तथ्य; ई-कॉमर्सही धोक्यात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशात गेल्या वर्षी (२०१८-१९) झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांमध्ये सर्वाधिक हल्ले बँकिंग, वित्त, प्रशासन आणि पायाभूत सोयीसुविधा आदी क्षेत्रांवर झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात 'सिस्को इंडिया'चे संचालक विशाल रमण म्हणाले, की 'हॅकर्सकडून सातत्याने हल्ले करण्यात येत असून, देशातील आर्थिक व्यवस्थांना ते लक्ष्य बनवित आहेत. आमच्या निरीक्षणांनुसार गेल्या वर्षी झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी २०.१ टक्के हल्ले बँकिंग, वित्तीय क्षेत्रावर, १९.६ टक्के हल्ले सरकारी स्तरावर आणि १५.१ टक्के हल्ले पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रावर झाले आहेत.'
रमण यांच्या मते सायबर गुन्हेगारांकडून संरक्षण (१५.१ टक्के), माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार आणि हेल्थकेअर आदी क्षेत्रांनाही टार्गेट करण्याचे प्रमाण वाढत आहे. हॅकर्स पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून हॅकर्सनी रिटेल, हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन आणि ई-कॉमर्स आदी क्षेत्रांकडेही मोर्चा वळवला आहे. रॅनसमवेअरच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, वाहतूक आणि वित्तीय क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात येत आहे.
लाखो डॉलरचे नुकसान
'सिस्को'तर्फे सादर करण्यात आलेल्या 'एशिया पॅसिफिक सिक्युरिटी कॅपॅबिलिटीज बेंचमार्क स्टडी' या अहवालात नमूद केल्यानुसार २१ टक्के लोकांनी सायबर हल्ल्यांमुळे ५० लाख डॉलरपासून ९९ लाख डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. पाच टक्के मंडळींनी एक कोटी डॉलरहून अधिक फटका झाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे उत्पन्नाला फटका बसणे, ग्राहकांचा विश्वास उडणे आदी धोके सहन केल्याचेही या मंडळींनी सांगितले. २७ टक्के मंडळींनी सायबर हल्ल्यांमुळे एक लाख डॉलरपेक्षा कमी नुकसान झाल्याचेही मान्य केले आहे. हल्ल्यांची आणि त्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान वाढत असल्याचेही 'सिस्को'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आपल्या देशात आजवर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये ५० लाख डॉलरपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचे दिसून आले आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: देशात गेल्या वर्षी (२०१८-१९) झालेल्या एकूण सायबर हल्ल्यांमध्ये सर्वाधिक हल्ले बँकिंग, वित्त, प्रशासन आणि पायाभूत सोयीसुविधा आदी क्षेत्रांवर झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात 'सिस्को इंडिया'चे संचालक विशाल रमण म्हणाले, की 'हॅकर्सकडून सातत्याने हल्ले करण्यात येत असून, देशातील आर्थिक व्यवस्थांना ते लक्ष्य बनवित आहेत. आमच्या निरीक्षणांनुसार गेल्या वर्षी झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी २०.१ टक्के हल्ले बँकिंग, वित्तीय क्षेत्रावर, १९.६ टक्के हल्ले सरकारी स्तरावर आणि १५.१ टक्के हल्ले पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रावर झाले आहेत.'
रमण यांच्या मते सायबर गुन्हेगारांकडून संरक्षण (१५.१ टक्के), माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार आणि हेल्थकेअर आदी क्षेत्रांनाही टार्गेट करण्याचे प्रमाण वाढत आहे. हॅकर्स पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून हॅकर्सनी रिटेल, हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन आणि ई-कॉमर्स आदी क्षेत्रांकडेही मोर्चा वळवला आहे. रॅनसमवेअरच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, वाहतूक आणि वित्तीय क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात येत आहे.
लाखो डॉलरचे नुकसान
'सिस्को'तर्फे सादर करण्यात आलेल्या 'एशिया पॅसिफिक सिक्युरिटी कॅपॅबिलिटीज बेंचमार्क स्टडी' या अहवालात नमूद केल्यानुसार २१ टक्के लोकांनी सायबर हल्ल्यांमुळे ५० लाख डॉलरपासून ९९ लाख डॉलरपर्यंतचे आर्थिक नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. पाच टक्के मंडळींनी एक कोटी डॉलरहून अधिक फटका झाल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे उत्पन्नाला फटका बसणे, ग्राहकांचा विश्वास उडणे आदी धोके सहन केल्याचेही या मंडळींनी सांगितले. २७ टक्के मंडळींनी सायबर हल्ल्यांमुळे एक लाख डॉलरपेक्षा कमी नुकसान झाल्याचेही मान्य केले आहे. हल्ल्यांची आणि त्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान वाढत असल्याचेही 'सिस्को'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आपल्या देशात आजवर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये ५० लाख डॉलरपेक्षा अधिक रकमेचा फटका बसल्याचे दिसून आले आहे.