लाॅकडाऊननंतर समाजात शिस्तबद्धता हवी: निती आयोग
सध्या करोना रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरु असले तरी जेव्हा ते शिथिल होईल, तेव्हा समाजाने अधिक जबाबदारीने आणि शिस्तबद्धतेने वागणे अपेक्षित आहे, असे मत निती आयोगाचे सदस्य आणि 'DRDO'चे माजी अध्यक्ष व्ही. के सारस्वत यांनी व्यक्त केले. 'करोना'सारख्या जीवघेण्या रोगाला रोखण्यासाठी समाजाचा शिस्तबद्ध सहभाग आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2020, 3:08 pm
बंगळुरु : सध्या करोना रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन सुरु असले तरी जेव्हा ते शिथिल होईल, तेव्हा समाजाने अधिक जबाबदारीने आणि शिस्तबद्धतेने वागणे अपेक्षित आहे, असे मत निती आयोगाचे सदस्य आणि 'DRDO'चे माजी अध्यक्ष व्ही. के सारस्वत यांनी व्यक्त केले. 'करोना'सारख्या जीवघेण्या रोगाला रोखण्यासाठी समाजाचा शिस्तबद्ध सहभाग आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
शेअर बाजारात घसरण: ‘इक्विटी फंडां’कडून निराशा
भारतीय समाजाने यापुढे उच्च दर्जाची शिस्तबद्धता अंगिकारली पाहिजे. जेव्हा ही टाळेबंदी हटवली जाईल, तेव्हा समाजाने नियमांचे पालन करुन यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. मोठे सोहळे टाळावेत सोशल डिस्टसिंगचे भान राखून करोनाचा प्रादुर्भाव रोखावा, असे आवाहन सारस्वत यांनी केले.
'IRDA'चा निर्णय: आयुर्विमा पॉलिसीधारकांना फायदा!
आजच्या घडीला देशाला शिस्तबद्ध समाजाची गरज आहे. सध्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा यांचे आधुनिकिकरण करणे आवश्यक आहे. कच्चा मालाचा सुरळीत पुरवठा सुरु ठेवल्यास उत्पादन प्रक्रिया विनाअडथळा सुरु राहील असे, त्यांनी सांगितले. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरुन काढण्यासाठी देशाला व्यापक उत्पादन क्षमतेची गरज आहे.
घरच्या जेवणाला पसंती; स्विगी-झोमॅटोचा धंदा डाऊन
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत ते म्हणाले की, उपचारांबाबत खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालये असा भेदभाव असता कामा नये, सर्वांनीच या संकटकाळात युद्धपातळीवर काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा सारस्वत यांनी व्यक्त केली.
शेअर बाजारात घसरण: ‘इक्विटी फंडां’कडून निराशा
भारतीय समाजाने यापुढे उच्च दर्जाची शिस्तबद्धता अंगिकारली पाहिजे. जेव्हा ही टाळेबंदी हटवली जाईल, तेव्हा समाजाने नियमांचे पालन करुन यंत्रणेला सहकार्य केले पाहिजे. मोठे सोहळे टाळावेत सोशल डिस्टसिंगचे भान राखून करोनाचा प्रादुर्भाव रोखावा, असे आवाहन सारस्वत यांनी केले.
'IRDA'चा निर्णय: आयुर्विमा पॉलिसीधारकांना फायदा!
आजच्या घडीला देशाला शिस्तबद्ध समाजाची गरज आहे. सध्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा यांचे आधुनिकिकरण करणे आवश्यक आहे. कच्चा मालाचा सुरळीत पुरवठा सुरु ठेवल्यास उत्पादन प्रक्रिया विनाअडथळा सुरु राहील असे, त्यांनी सांगितले. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरुन काढण्यासाठी देशाला व्यापक उत्पादन क्षमतेची गरज आहे.
घरच्या जेवणाला पसंती; स्विगी-झोमॅटोचा धंदा डाऊन
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत ते म्हणाले की, उपचारांबाबत खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालये असा भेदभाव असता कामा नये, सर्वांनीच या संकटकाळात युद्धपातळीवर काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा सारस्वत यांनी व्यक्त केली.