वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे… तिकीट काढूनही ते 'कन्फर्म' झाले नाही, तर वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. कारण, तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकणार आहे. ‘आयआरसीटीसी’ आणि ‘एअर इंडिया’मध्ये नुकताच या विषयी करार झाला. तिकीट ज्या मार्गासाठी काढले आहे; त्या मार्गावर ‘एअर इंडिया’ची उड्डाणे होत असतील, तरच या सुविधेचा लाभ घेता येईल. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे.
‘एअर इंडिया’-‘आयआरसीटी’ करार
‘एअर इंडिया’च्या चेअरमन अश्विनी लोहानी यांनी कराराविषयी माहिती दिली. दोन्ही कंपन्यांतर्फे कॉर्पोरेट कराराअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजना नक्की काय?
>प्रवाशाने ‘राजधानी’चे एसी प्रथम श्रेणीचे तिकीट काढले असेल आणि प्रवासाच्या दिवसापर्यंत ते कन्फर्म झाले नसेल, तर त्याला त्याच मार्गावर ‘एअर इंडिया’च्या विमानाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
>या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वे सुटायच्या २४ तास आधी ‘एअर इंडिया’कडून बुकिंग घ्यावे लागेल.
>ज्या मार्गासाठी ‘राजधानी’चे तिकीट काढले आहे; त्याच मार्गावर ‘एअर इंडिया’तून प्रवास करता येईल.
>सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही सुविधा केवळ ‘राजधानी एक्स्प्रेस’साठीच उपलब्ध आहे.
सेकंड एसीलाही फायदा मिळणार
>सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राजधानी’चे सेकंड एसीचे तिकीट काढणाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
>सेकंड एसीचे तिकीट काढणाऱ्यांना विमानप्रवासाची संधी मिळवायची असेल, तर त्यांना फर्स्ट एसी आणि सेकंड एसीच्या तिकिटातील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे.
>सेकंड एसी आणि थर्ड एसीचे तिकीट काढणाऱ्यांना विमानप्रवासाची इच्छा असल्यास त्यांना फरकाची अंदाजे दोन हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.
>मात्र, विमानप्रवासाची संधी प्राधान्याने फर्स्ट एसीच्या प्रवाशांना मिळणार आहे.
>खरे पाहता ज्या मार्गांवर एअर इंडिया आणि राजधानीची सेवा उपलब्ध आहे, त्या मार्गांवर विमानाच्या इकॉनॉमी क्लासचे तिकीट आणि फर्स्ट एसीचे भाडे जवळपास सारखेच आहे.
राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे… तिकीट काढूनही ते 'कन्फर्म' झाले नाही, तर वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. कारण, तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळू शकणार आहे. ‘आयआरसीटीसी’ आणि ‘एअर इंडिया’मध्ये नुकताच या विषयी करार झाला. तिकीट ज्या मार्गासाठी काढले आहे; त्या मार्गावर ‘एअर इंडिया’ची उड्डाणे होत असतील, तरच या सुविधेचा लाभ घेता येईल. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही सुविधा सुरू होणार आहे.
‘एअर इंडिया’-‘आयआरसीटी’ करार
‘एअर इंडिया’च्या चेअरमन अश्विनी लोहानी यांनी कराराविषयी माहिती दिली. दोन्ही कंपन्यांतर्फे कॉर्पोरेट कराराअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजना नक्की काय?
>प्रवाशाने ‘राजधानी’चे एसी प्रथम श्रेणीचे तिकीट काढले असेल आणि प्रवासाच्या दिवसापर्यंत ते कन्फर्म झाले नसेल, तर त्याला त्याच मार्गावर ‘एअर इंडिया’च्या विमानाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.
>या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रेल्वे सुटायच्या २४ तास आधी ‘एअर इंडिया’कडून बुकिंग घ्यावे लागेल.
>ज्या मार्गासाठी ‘राजधानी’चे तिकीट काढले आहे; त्याच मार्गावर ‘एअर इंडिया’तून प्रवास करता येईल.
>सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही सुविधा केवळ ‘राजधानी एक्स्प्रेस’साठीच उपलब्ध आहे.
सेकंड एसीलाही फायदा मिळणार
>सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राजधानी’चे सेकंड एसीचे तिकीट काढणाऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
>सेकंड एसीचे तिकीट काढणाऱ्यांना विमानप्रवासाची संधी मिळवायची असेल, तर त्यांना फर्स्ट एसी आणि सेकंड एसीच्या तिकिटातील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे.
>सेकंड एसी आणि थर्ड एसीचे तिकीट काढणाऱ्यांना विमानप्रवासाची इच्छा असल्यास त्यांना फरकाची अंदाजे दोन हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे.
>मात्र, विमानप्रवासाची संधी प्राधान्याने फर्स्ट एसीच्या प्रवाशांना मिळणार आहे.
>खरे पाहता ज्या मार्गांवर एअर इंडिया आणि राजधानीची सेवा उपलब्ध आहे, त्या मार्गांवर विमानाच्या इकॉनॉमी क्लासचे तिकीट आणि फर्स्ट एसीचे भाडे जवळपास सारखेच आहे.