नवी दिल्ली ः टाटा सन्सचे अध्यक्ष असताना सायरस मिस्त्री यांनीच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते, असा शाब्दिक हल्ला टाटा सन्सने मंगळवारी चढवला. टाटा सन्सच्या प्रवक्त्यानुसार, सायरस मिस्त्री ज्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत आहेत, त्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखादी व्यक्ती टाटा समूहाची कर्मचारी राहिली नाही तर तिने स्वतःहून टाटा कंपन्यांच्या संचालक मंडळावरून पायउतार होणे गरजेचे आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर मिस्त्री हे टाटा समूहाचे कर्मचारी राहिलेले नाहीत. अद्याप ते टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळात, अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मिस्त्री सांगत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे त्यांनीच उल्लंघन केले आहे, याकडेही या प्रवक्त्याने लक्ष वेधले आहे.
टाटांचा शाब्दिक वार
टाटा सन्सचे अध्यक्ष असताना सायरस मिस्त्री यांनीच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले होते, असा शाब्दिक हल्ला टाटा सन्सने मंगळवारी चढवला.
Maharashtra Times 7 Dec 2016, 3:00 am