वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या 'आयुष्यमान भारत'चा पहिला दावा वितरित करण्यात आला आहे. मोदी यांनी १५ ऑगस्टला देशाला संबोधित करताना या योजनेची घोषणा केली होती. हरयाणातील कर्नाल गावातील अवघ्या १९ दिवसांच्या करिश्मासाठी हा दावा वितरित करण्यात आला. त्यामुळे या देशव्यापी योजनेची पहिली लाभार्थी ठरण्याचा मान करिश्माला प्राप्त झाला आहे. त्या अंतर्गत तिच्या आई-वडिलांना ९,००० रुपये देण्यात आले.
करिश्माचा जन्म कर्नालच्या कल्पना चावला रुग्णालयात झाला. 'आयुष्यमान भारत' योजनेमध्ये तिचा आणि तिच्या मातापित्याचा समावेश झाल्यामुळे त्यांचा संपू्ण वैद्यकीय खर्च आता सरकारतर्फे उचलण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही बातमी ट्विट केली असून, आयुष्यमान भारतचा पहिला क्लेम आमच्या राज्यात दिला गेल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
'आयुष्यमान भारत' योजनेची सुरुवात २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून करण्यात येणार आहे. मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून योजनेची घोषणा करताना प्रायोगिक तत्वावर ही योजना देशातील काही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या योजनेनुसार प्रतिकुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे कवच विनामूल्य मिळणार आहे. या अंतर्गत करिश्माचा दावा मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या 'आयुष्यमान भारत'चा पहिला दावा वितरित करण्यात आला आहे. मोदी यांनी १५ ऑगस्टला देशाला संबोधित करताना या योजनेची घोषणा केली होती. हरयाणातील कर्नाल गावातील अवघ्या १९ दिवसांच्या करिश्मासाठी हा दावा वितरित करण्यात आला. त्यामुळे या देशव्यापी योजनेची पहिली लाभार्थी ठरण्याचा मान करिश्माला प्राप्त झाला आहे. त्या अंतर्गत तिच्या आई-वडिलांना ९,००० रुपये देण्यात आले.
करिश्माचा जन्म कर्नालच्या कल्पना चावला रुग्णालयात झाला. 'आयुष्यमान भारत' योजनेमध्ये तिचा आणि तिच्या मातापित्याचा समावेश झाल्यामुळे त्यांचा संपू्ण वैद्यकीय खर्च आता सरकारतर्फे उचलण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही बातमी ट्विट केली असून, आयुष्यमान भारतचा पहिला क्लेम आमच्या राज्यात दिला गेल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
'आयुष्यमान भारत' योजनेची सुरुवात २५ सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून करण्यात येणार आहे. मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून योजनेची घोषणा करताना प्रायोगिक तत्वावर ही योजना देशातील काही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या योजनेनुसार प्रतिकुटुंबास दरवर्षी पाच लाख रुपयांच्या आरोग्यविम्याचे कवच विनामूल्य मिळणार आहे. या अंतर्गत करिश्माचा दावा मंजूर करण्यात आला आहे.