अ‍ॅपशहर

पीपीई किट निर्मितीत या शहराने घेतली आघाडी; १५ हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

भारताने जगाला आतापर्यंत फक्त औषधांचा पुरवठा केला आहे. पण पुढील काळात पीपीई किट्स आणि मास्कचा पुरवठाही भारताकडून केला जाऊ शकतो. यासाठी स्थानिक निर्यातदारांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. तामिळनाडूत पीपीई किट्सची निर्मिती युद्ध पातळीवर सुरू असून भविष्यात जागतिक मानकांनुसार ही निर्मिती केली जाणार आहे. सध्या भारतातील गरज भागवण्यावर भर दिला जातोय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2020, 4:45 pm
चेन्नई : दक्षिण भारतातील सुती कापडाच्या विणकामाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या तिरुप्पूरने आता नवी आघाडी घेतली आहे. करोनाशी लढा देताना अत्यावश्यक असलेल्या पीपीई किट्सच्या निर्मितीची सुरुवात तिरुप्पूरमध्ये करण्यात आली आहे. मास्क आणि बॉडी किटच्या माध्यमातून तिरुप्पूरच्या उद्योगांसाठी १५ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्याचं उद्योजकांनी सांगितलं. तामिळनाडूतील २०० युनिट सध्या पीपीई किटवर काम करत आहेत, ज्यातील बहुतांश देशांतर्गत गरज भागवणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ppre


अर्थव्यवस्थेसाठी RBI वापरणार हे ५ अस्त्र?

भारतात तयार झालेल्या पीपीई किट्स देशाच्या बाहेरही जाव्या यासाठी तिरुप्पूर निर्यातदार संघटनेने पुढाकार घेतला आहे. उत्पादन निर्मिती करताना जागितक मानकांनुसार ही निर्मिती व्हावी याची दक्षता ही संघटना घेत आहे. चीनच्या पीपीई किट आणि मास्क खराब निघाल्याची तक्रार अनेक देशांनी केली. त्यातच भारत या सांधनांसाठी चांगला निर्यातदार म्हणून पुढे आल्यास जगभरातील देश भारताकडून या वस्तू घेतील, असं जाणकार सांगतात.

तिरुप्पूरमधील युनिट्स सध्या फक्त देशातील गरज भागवत आहेत. पण आम्हाला एकदा तंत्रज्ञान मिळालं आणि बाजारपेठ खुली झाली की जगातही भारताच्या किट्स जातील. जगभरात यासाठी मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया निर्यातदार संघटना महासचिव टीआर विजया कुमार यांनी ईटीशी बोलताना दिली. या वर्षातच १० ते १५ हजार कोटी रुपये महसुलाची संधी असल्याचंही ते म्हणाले.

हायवे ढाबा पाहिजे? परिवहन मंत्रालयाने दिली यादी

दरम्यान, सध्या तरी निर्यातदार चिंतेत आहेत. कारण, युरोप आणि अमेरिका ही निर्यातदारांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पण या दोन्ही मोठ्या बाजारपेठेत करोनाचा उद्रेक झाल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेक शिपमेंटची रक्कम येणंही अजून बाकी असल्याचं निर्यातदार सांगतात. कपडा निर्मिती कंपन्यांकडून वर्षाला स्थानिक बाजारपेठ आणि निर्यातीसाठी एकूण ६० हजार कोटी रुपयांच्या कापडाची निर्मिती केली जाते. तिरुप्पूरमधील विणकाम उद्योगाने ८ लाख जणांना रोजगार दिला आहे, ज्यातील बहुतांश स्थलांतरित कामगार आहेत, अशी माहिती संघटनेने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज