नवी दिल्ली: देशभर लाॅकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या जवळपास साडेतीन लाख ट्रक्सचा खोळंबा झाला आहे. उत्पादन प्रकल्प, गोदामे या ठिकाणी ही वाहने अडकून पडली आहे. या साडेतीन लाख ट्रक्समध्ये तब्बल ३५ हजार कोटींचा माल आहे.
वाचा: आर्थिक संकटावर मात करण्यास महाराष्ट्र सज्ज!
मालवाहतूक करणाऱ्या संघटनेच्या अंदाजानुसार देशभरात विविध राज्यांमध्ये ३ लाख ५० हजार वाहने अडकून पडली आहेत. ही वाहने आंतरराज्य मालाची वाहतूक करतात. बहुतांश वाहने कंपन्या, प्रकल्प, गोदामे या ठिकाणी रखडली आहेत. या वाहनांमध्ये जीवनावश्यक वस्तू, एसी, वाॅशिंगमशीन, फ्रीज यासारखी घरगुती उपकरणे, दुचाकी, मोटारी, उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, सिमेंट, पोलाद आदी वस्तू आहेत. देशभरात विविध ठिकाणी अशी साडेतीन लाख वाहने अडकून पडली असून त्यात ३५००० कोटींचा माल आहे.
लाॅकडाऊनमुळे वाहनचालक, क्लिनर यांची खाण्याची आभाळ झाली आहे. अनेकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. परिणामी या वाहनांमधील माल खराब होण्याची जोखीम वाढली आहे. या मालाची वेळेत वाहतूक झाली नाही तर माल खराब होऊन कोट्यवधींचे नुकसान होईल, अशी भीती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनचे अध्यक्ष कुलतरण सिंग अतवाल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, रस्त्यांवरील माल वाहतूक तातडीने सुरु करणे गरजेचे आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनचे देशभरात एक कोटींहून अधिक सभासद आहेत. अत्यावश्यक वस्तूंबरोबरच औषधे, धान्य, स्वच्छतेविषयक उत्पादनांची या वाहनांमधून वाहतूक केली जाते. आता दोन आठवडे होऊन गेले असून लाॅकडाऊनने माल वाहतुकीला जबर फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने या उद्योगाला मदत करावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. सरकारने माल वाहतूकदारांना किमान सहा महिन्यांकरिता कर्जाच्या हप्त्यातून सवलत द्यावी, रस्ते कर आणि जीएसटीतून दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
माल वाहतूकदार वाहन खरेदीमुळे कर्जाच्या बोजाखाली आहेत. त्यातच जर व्यवसाय आणि काहीकाळ असाच ठप्प राहिला तर माल वाहतूकदार दिवाळखोरीत जातील, अशी शक्यता आॅल इंडिया ट्रान्सपोटर्स वेलफेअर असोसिएशनेचे अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी व्यक्त केली.
वाचा: आर्थिक संकटावर मात करण्यास महाराष्ट्र सज्ज!
मालवाहतूक करणाऱ्या संघटनेच्या अंदाजानुसार देशभरात विविध राज्यांमध्ये ३ लाख ५० हजार वाहने अडकून पडली आहेत. ही वाहने आंतरराज्य मालाची वाहतूक करतात. बहुतांश वाहने कंपन्या, प्रकल्प, गोदामे या ठिकाणी रखडली आहेत. या वाहनांमध्ये जीवनावश्यक वस्तू, एसी, वाॅशिंगमशीन, फ्रीज यासारखी घरगुती उपकरणे, दुचाकी, मोटारी, उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल, सिमेंट, पोलाद आदी वस्तू आहेत. देशभरात विविध ठिकाणी अशी साडेतीन लाख वाहने अडकून पडली असून त्यात ३५००० कोटींचा माल आहे.
लाॅकडाऊनमुळे वाहनचालक, क्लिनर यांची खाण्याची आभाळ झाली आहे. अनेकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. परिणामी या वाहनांमधील माल खराब होण्याची जोखीम वाढली आहे. या मालाची वेळेत वाहतूक झाली नाही तर माल खराब होऊन कोट्यवधींचे नुकसान होईल, अशी भीती आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनचे अध्यक्ष कुलतरण सिंग अतवाल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, रस्त्यांवरील माल वाहतूक तातडीने सुरु करणे गरजेचे आहे.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनचे देशभरात एक कोटींहून अधिक सभासद आहेत. अत्यावश्यक वस्तूंबरोबरच औषधे, धान्य, स्वच्छतेविषयक उत्पादनांची या वाहनांमधून वाहतूक केली जाते. आता दोन आठवडे होऊन गेले असून लाॅकडाऊनने माल वाहतुकीला जबर फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने या उद्योगाला मदत करावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. सरकारने माल वाहतूकदारांना किमान सहा महिन्यांकरिता कर्जाच्या हप्त्यातून सवलत द्यावी, रस्ते कर आणि जीएसटीतून दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
माल वाहतूकदार वाहन खरेदीमुळे कर्जाच्या बोजाखाली आहेत. त्यातच जर व्यवसाय आणि काहीकाळ असाच ठप्प राहिला तर माल वाहतूकदार दिवाळखोरीत जातील, अशी शक्यता आॅल इंडिया ट्रान्सपोटर्स वेलफेअर असोसिएशनेचे अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी व्यक्त केली.