नवी दिल्ली : भारतीय बँकांमध्ये दावा न केलेल्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात बँकांमधील दावा न केलेली रक्कम ४८,२६२ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. तर मागील आर्थिक वर्षात ही रक्कम ३९,२६४ कोटी रुपये होती. आणि आता या बेकायदेशीर रकमेचे दावेदार शोधण्यासाठी आरबीआयने मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक त्या ८ राज्यांवर आपले लक्ष केंद्रित करेल, जिथे जास्तीत जास्त रक्कम जमा केली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या खात्यातून १० वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला नाही, तर त्या खात्यात जमा केलेली रक्कम दावा न केलेली ठरते. तसेच ज्या खात्यातून व्यवहार होत नाहीत ते खाते निष्क्रिय होते. दावा न केलेली रक्कम बचत खाते, चालू खाते, मुदत ठेव आणि आवर्ती ठेव खात्यात असू शकते. दावा न केलेली रक्कम रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये (DEAF) जमा केली जाते.
वाचा - सावधान, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रेड अलर्ट; विकास दर घसरण्याच्या मार्गावर
आठ राज्यांत जास्त पैसा
एका अहवालानुसार रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की यामधील बहुतांश रक्कम तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशमधील बँकांमध्ये जमा आहे. रिझव्र्ह बँकेने सांगितले की, बँकांनी अनेक जागरुकता मोहिमा राबवूनही कालांतराने दावा न केलेली रक्कम सातत्याने वाढत आहे.
वाचा - प्राप्तिकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास दंडाची कारवाई, 'हे' टाळण्यासाठी वेळेपूर्वी करा घाई
यामागचे कारण काय?
अनेक खाती दीर्घकाळ सुप्त पडून असल्याने दावा न केलेल्या रकमेत वाढ होत आहे. दरवर्षी अशा खात्यांतील पैसे DEAF कडे जमा होत आहेत. बँक खाते निष्क्रिय होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा पत्ता किंवा नॉमिनीची (नामनिर्देशित) खात्यात नोंदणी नसणे.
बँकेच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध
जर दावा न केलेल्या खात्याची रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता खात्यात गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागेल. दावा न केलेल्या ठेवींची माहिती सामान्यतः फक्त बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. खातेदाराच्या पॅनकार्ड, जन्मतारीख, नाव आणि पट्ट्यासह दावा न केलेल्या रक्कम खातेदाराच्या खात्यात पडून आहे की नाही याची माहिती मिळू शकते.
वाचा - सावधान, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी रेड अलर्ट; विकास दर घसरण्याच्या मार्गावर
आठ राज्यांत जास्त पैसा
एका अहवालानुसार रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की यामधील बहुतांश रक्कम तामिळनाडू, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा/आंध्र प्रदेशमधील बँकांमध्ये जमा आहे. रिझव्र्ह बँकेने सांगितले की, बँकांनी अनेक जागरुकता मोहिमा राबवूनही कालांतराने दावा न केलेली रक्कम सातत्याने वाढत आहे.
वाचा - प्राप्तिकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास दंडाची कारवाई, 'हे' टाळण्यासाठी वेळेपूर्वी करा घाई
यामागचे कारण काय?
अनेक खाती दीर्घकाळ सुप्त पडून असल्याने दावा न केलेल्या रकमेत वाढ होत आहे. दरवर्षी अशा खात्यांतील पैसे DEAF कडे जमा होत आहेत. बँक खाते निष्क्रिय होण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की खातेदाराचा मृत्यू, कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या खात्याबद्दल माहिती नसणे, चुकीचा पत्ता किंवा नॉमिनीची (नामनिर्देशित) खात्यात नोंदणी नसणे.
बँकेच्या वेबसाइटवर माहिती उपलब्ध
जर दावा न केलेल्या खात्याची रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता खात्यात गेली असेल, तर ती परत मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा लागेल. दावा न केलेल्या ठेवींची माहिती सामान्यतः फक्त बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. खातेदाराच्या पॅनकार्ड, जन्मतारीख, नाव आणि पट्ट्यासह दावा न केलेल्या रक्कम खातेदाराच्या खात्यात पडून आहे की नाही याची माहिती मिळू शकते.