म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
अर्थसंकल्पाची उत्सुकता वाढत असतानाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज, गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी भरीव तरतूद असण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी बुधवारी दुपारी अचानक परळ, एल्फिन्स्टन येथील पादचारी पुलांची पाहणी करताना मुंबईकरांना दिलासा मिळणाऱ्या सुविधा मिळतील, असे सूतोवाचही केले.
लष्कराने एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आणल्यानंतर गोयल यांनी दुपारी तिथे भेट दिली. सायनहून लोकलने रेल्वेमंत्री परळ स्थानकात आले. पाहणी केल्यावर त्यांनी कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी प्रवाशांना ये-जा करण्यात अडथळे येऊ नयेत, याची दक्षता घेण्याची व परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील पाणपोई, खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याची सूचना त्यांनी केली. परळ पुलानंतर त्यांनी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी होते.
एल्फिन्स्टन-परळ येथील दोन्ही स्थानकांकडे सरकत्या जिने उभारण्यात यावेत, अशी प्रमुख सूचना गोयल त्यांनी यावेळी केली. ही पाहणी करताना मध्य रेल्वेने एलटीटी येथे अल्पावधीत तयार केलेल्या पादचारी पुलाचेही त्यांनी कौतुक केले. तसेच लष्करास तिन्ही पुलांची जबाबदारी सोपवताना त्यातून रेल्वेची कार्यक्षमता वाढण्यास सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, आंबिवली, करी रोड येथील पादचारी पुलाचे काम लष्कराकडे सोपवण्यात आले. त्यापैकी आंबिवलीचे काम पूर्ण झाले असून, जोडपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण महिन्याभरात सर्व पूल प्रवाशांसाठी खुले करण्याचे संकेत दिले जात आहेत.
लातूरमध्ये डब्येनिर्मितीचा कारखाना
लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी झालेल्या भेटीनंतर दिली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गोयल यांचे आभार मानले. सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.
अर्थसंकल्पाची उत्सुकता वाढत असतानाच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज, गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी भरीव तरतूद असण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी बुधवारी दुपारी अचानक परळ, एल्फिन्स्टन येथील पादचारी पुलांची पाहणी करताना मुंबईकरांना दिलासा मिळणाऱ्या सुविधा मिळतील, असे सूतोवाचही केले.
लष्कराने एल्फिन्स्टन-परळ जोडपुलाचे काम जवळपास पूर्णत्वास आणल्यानंतर गोयल यांनी दुपारी तिथे भेट दिली. सायनहून लोकलने रेल्वेमंत्री परळ स्थानकात आले. पाहणी केल्यावर त्यांनी कामाविषयी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी प्रवाशांना ये-जा करण्यात अडथळे येऊ नयेत, याची दक्षता घेण्याची व परळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील पाणपोई, खाद्यपदार्थांचे स्टॉल हटवण्याची सूचना त्यांनी केली. परळ पुलानंतर त्यांनी एल्फिन्स्टन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी होते.
एल्फिन्स्टन-परळ येथील दोन्ही स्थानकांकडे सरकत्या जिने उभारण्यात यावेत, अशी प्रमुख सूचना गोयल त्यांनी यावेळी केली. ही पाहणी करताना मध्य रेल्वेने एलटीटी येथे अल्पावधीत तयार केलेल्या पादचारी पुलाचेही त्यांनी कौतुक केले. तसेच लष्करास तिन्ही पुलांची जबाबदारी सोपवताना त्यातून रेल्वेची कार्यक्षमता वाढण्यास सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
एल्फिन्स्टन पुलावरील दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन-परळ जोडपूल, आंबिवली, करी रोड येथील पादचारी पुलाचे काम लष्कराकडे सोपवण्यात आले. त्यापैकी आंबिवलीचे काम पूर्ण झाले असून, जोडपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण महिन्याभरात सर्व पूल प्रवाशांसाठी खुले करण्याचे संकेत दिले जात आहेत.
लातूरमध्ये डब्येनिर्मितीचा कारखाना
लातूर येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बुधवारी झालेल्या भेटीनंतर दिली. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी गोयल यांचे आभार मानले. सह्याद्री या राज्य अतिथीगृहावर गोयल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी झालेल्या चर्चेत या निर्णयाची माहिती देण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याबद्दल लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.