अ‍ॅपशहर

केंद्राचे राज्य सरकारांना आदेश

उद्योगांची वाढ झपाट्याने व्हावी, यासाठी त्यांना अखंड वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. याकरता सर्व राज्य सरकारांनी उद्योगांना स्थिर दराने वीज द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने गुरूवारी दिले.

Maharashtra Times 29 Jul 2016, 3:00 am
उद्योगांसाठी स्थिर दराने वीज द्या वृत्तसंस्था, नवी दिल्ली उद्योगांची वाढ झपाट्याने व्हावी, यासाठी त्यांना अखंड वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. याकरता सर्व राज्य सरकारांनी उद्योगांना स्थिर दराने वीज द्यावी, असे आदेश केंद्र सरकारने गुरूवारी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम union govt asks states to provide power to industry at stable rates
केंद्राचे राज्य सरकारांना आदेश


देशात पुरेशी वीजनिर्मिती होत आहे, असा दावा केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत केला. ते म्हणाले, वीज पुरेश असताना तिचे वाटप करण्यासाठी दर स्थिर असणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यासच उद्योगांना अखंड वीज मिळू शकणार आहे. उद्योगांना वीजपुरवठ्याची हमी दिल्यासच उद्योगांमध्ये नव्याने गुंतवणूक येईल. यासाठी प्रत्येक राज्याच्या सरकारांना वीजदर स्थिर ठेवण्याबाबत प्रत्येक खासदाराने सांगावे, असे आवाहनही गोयल यांनी केले. वीजेचे पुढील १० ते १५ वर्षांसाठी दर प्रति युनिट ४, ४.५ किंवा ५ रुपये असावेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या एका अहवालानुसार देशातील वीजेची टंचाई २०१५-१६ या वर्षात २.१ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात सरकारला यश आले आहे. गेल्या वीस वर्षांतील ही सर्वात कमी टंचाई आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत वीजेची टंचाई ०.९ टक्क्यांवर आल्याचा दावाही त्यांनी केला.

पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक घराला वीज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्राधिकरणाच्या निरीक्षणानुसार, वीजेची मागणी व वीजेचा पुरवठा यामध्ये मोठी तफावत राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यात दिसून आली आहे. देशात पुरेशी वीज असताना असे होणे चांगले नाही, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज