मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला ५३ हजार कोटींचे शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे, मात्र यामध्ये केंद्र सरकारने कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला नाईलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागेल, असा ईशाराच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला आहे. बिर्ला यांच्या विधानाचे पडसाद शेअर बाजारात उमटले. शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या इशाऱ्याने वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईत सुरु असलेल्या एका कार्यक्रमात बिर्ला यांनी हे विधान केले आहे. नुकताच ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी सुद्धा जाहीर कार्यक्रमात सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. उदयोजकांच्या नाराजीने केंद्राच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी आयडियाचे व्होडाफोनमध्ये विलीनीकरण करण्यात आले. मात्र दूरसंचार परवाना आणि स्पेक्ट्रम शुक्लापोटी व्होडाफोन आयडियाला ५३ हजार ३८ कोटी सरकारकडे भरावे लागणार आहे. नुकताच व्होडाफोनला १. १७ लाख कोटींचा विक्रमी तोटा झाला होता. सरकारने या प्रकरणी दखल घेतली नाही तर भारतात व्यवसाय करणे अवघड आहे. व्होडाफोन आयडियाला सेवा बंद करावी लागेल, असे बिर्ला यांनी म्हटले आहे. केवळ दूरसंचार क्षेत्राला नव्हे तर एकूण औद्योगिक क्षेत्राला सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली आहे.
सेन्सेक्स ३६० अंकांनी कोसळला
दुसऱ्या तिमाहीत विकासदर ४.५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. मुंबई, दिल्ली सारख्या महानगरांमध्ये व्होडाफोनचे कोट्यवधी ग्राहक आहेत. काही आठवड्यापूर्वी व्होडाफोनच्या ग्लोबल सीईओनी सुद्धा भारतातील धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. कंपनीसाठी भारतात व्यवसाय करणे जिकरीचे बनले असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मुंबईत सुरु असलेल्या एका कार्यक्रमात बिर्ला यांनी हे विधान केले आहे. नुकताच ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी सुद्धा जाहीर कार्यक्रमात सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. उदयोजकांच्या नाराजीने केंद्राच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी आयडियाचे व्होडाफोनमध्ये विलीनीकरण करण्यात आले. मात्र दूरसंचार परवाना आणि स्पेक्ट्रम शुक्लापोटी व्होडाफोन आयडियाला ५३ हजार ३८ कोटी सरकारकडे भरावे लागणार आहे. नुकताच व्होडाफोनला १. १७ लाख कोटींचा विक्रमी तोटा झाला होता. सरकारने या प्रकरणी दखल घेतली नाही तर भारतात व्यवसाय करणे अवघड आहे. व्होडाफोन आयडियाला सेवा बंद करावी लागेल, असे बिर्ला यांनी म्हटले आहे. केवळ दूरसंचार क्षेत्राला नव्हे तर एकूण औद्योगिक क्षेत्राला सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा बिर्ला यांनी व्यक्त केली आहे.
सेन्सेक्स ३६० अंकांनी कोसळला
दुसऱ्या तिमाहीत विकासदर ४.५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. मुंबई, दिल्ली सारख्या महानगरांमध्ये व्होडाफोनचे कोट्यवधी ग्राहक आहेत. काही आठवड्यापूर्वी व्होडाफोनच्या ग्लोबल सीईओनी सुद्धा भारतातील धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली होती. कंपनीसाठी भारतात व्यवसाय करणे जिकरीचे बनले असल्याचे त्यांनी म्हटले होते.