अ‍ॅपशहर

नोकरदारांना झटका; वेतनवाढीबाबत कंपन्या अनुत्सुक

करोनामुळे कंपन्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे वेतनवाढीबाबत बहुतांश कंपन्यांनी अनुत्सुकता दर्शवली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 11:01 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना संक्रमणामुळे चालू वर्ष नोकरदारांसाठी निराशेचे ठरले आहे. एका अहवालानुसार पुढीलवर्षी बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता नाही. टीमलिजच्या प्रायमर रिपोर्ट २०२०नुसार यंदा फारच थोड्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा विचार करीत आहेत. या शिवाय देण्यात येणारी वेतनवाढही अतिशय किरकोळ असणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नोकरदार


अहवालानुसार काही कंपन्या आपल्या विशेष कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के वाढ करण्याचा विचार करीत आहे. या कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडून अन्यत्र जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. करोनामुळे कंपन्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मात्र, अशा स्थितीतही ई-कॉमर्स, स्टार्टअप, एफएमसीजी, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यनिगा आदी सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन ; थोड्याच वेळात पंतप्रधानांची घोषणा
अन्य सर्वच क्षेत्रांत नोकरीच्या आणि वेतनवाढीच्या संधी कमी असताना ई-कॉमर्स, एफएमसीजी, बीपीओ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र, चांगलीच वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी तोट्यात असणाऱ्या प्रवासी विमान उद्योगात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून वाहन उद्योगही मंदीचा सामना करीत आहे. तोट्यात असणाऱ्या या उद्योगातील कर्मचाऱ्यांचीही कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुलै महिन्यात रोजगार वाढला; पाहा तुमच्या शहरात किती संधी आहेत
करोनामुळे विदेश प्रवास आणि पर्यटन पूर्णपणे बंद असल्यामुळे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्या टूर ऑपरेटरच्या संख्येत घट करण्याची शक्यता आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या हॉटेल उद्योगातूनही कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

वेतनवाढीस कंपन्या अनुत्सुक

टीमलिज सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष ऋतुपर्ण चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपन्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यास अनुत्सुक आहेत. असे असले, तरी विशेष कौशल्ये बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि अन्य लाभ देण्याची कंपन्यांची तयारी आहे. सध्याच्या करोना संक्रमणाच्या काळात अशा कर्मचाऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज