अ‍ॅपशहर

विप्रोने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

विप्रोच्या ६०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोने एकाच वेळी ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कर्मचाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा ठपका कंपनीने ठेवला आहे.

Maharashtra Times 20 Apr 2017, 9:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wipro sacks 600 employees on performance grounds
विप्रोने ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले


विप्रोच्या ६०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या विप्रोने एकाच वेळी ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कर्मचाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा ठपका कंपनीने ठेवला आहे.

वार्षिक 'परफॉर्मन्स अॅपराइजल' दरम्यान कंपनीने ६०० कर्मचाऱ्यांना काढले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. किमान २ हजार कर्मचाऱ्यांना विप्रोतून काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत विप्रोचे १.७९ लाख कर्मचारी होते.

कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामिगिरीचा आढावा कंपनी घेत आहे. ग्राहकांची मागणी, कंपनीचे प्रधान्य आणि व्यावसायिक हेतू या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्यांची तयारी बघितली जात आहे. यातून अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जात आहे. दरवर्षी ही संख्या वेगवेगळी असते, अशी माहिती विप्रोतील सूत्रांनी दिली. नेमक्या किती कर्मचाऱ्यांना काढणार आहे, याची माहिती मात्र देण्यात आली नाही.

अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने व्हिसाचे नियम बदलून अधिक कडक केले आहेत. यामुळे भारतीय आयटी कंपन्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणींचा सामना करत असताना दुसरीकडे भारतातही आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. कंपन्यांनी ऑटोमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिल्याने आयटी कार्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज