नवी दिल्ली ः सरकारने गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर रोजी सुवर्ण चलनीकरण योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत या योजनेंतर्गत १०५ ठेवीदारांनी २.८ टन सोने जमा केले आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. या योजनेंतर्गत, मंदिर आणि ट्रस्ट यांनी आतापर्यंत १ हजार ५१२ किलो सोने जमा केले असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सुरुवातीला या योजनेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, ही योजना अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात आवश्यक बदल करण्यात आले. सध्या, या योजनेत सोने कलेक्शन व शुद्धता तपासणी केंद्र म्हणून ४६ मूल्यमापन व हॉलमार्किंग केंद्रे सहभागी आहेत. अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सिन्हा म्हणाले, यंदा २० एप्रिलपर्यंत, प्रधान मंत्री जन धन योजनेत २१.६१ कोटी खाती उघडण्यात आली. त्यापैकी ९.६२ कोटी खात्यांमध्ये आधार क्रमांक समाविष्ट केला आहे.
सुवर्णसंचय योजनेत साठले २.८ टन सोने
नवी दिल्ली ः सरकारने गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर रोजी सुवर्ण चलनीकरण योजना जाहीर केल्यापासून आतापर्यंत या योजनेंतर्गत १०५ ठेवीदारांनी २.८ टन सोने जमा केले आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
Maharashtra Times 4 May 2016, 3:00 am