आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक
बारावी विज्ञानशाखेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाभाविकपणे इंजिनीअरिंग वा वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे असतो. मुलभूत विज्ञानशाखांमध्ये देखील चांगले करिअर करता येईल याची जाणीव विद्यार्थी व पालकांमध्ये नसते. परिणामत: विज्ञानशाखेच्या विविध विषयांमध्ये चांगली प्रतिभा असलेले विद्यार्थी हे इंजिनीअरिंग वा वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी पूर्ण करुन एखादी चांगली नोकरी मिळवण्यातच समाधान मानतात. यामधील अपवादात्मक विद्यार्थीच संशोधनाच्या वाटेवर वळताना दिसतात. संशोधन स्थानिक वा जागतिक गरजेच्या दिशेने केल्यास त्यातून चांगली संपत्ती निर्माण होते. या संशोधनावर आधारीत तंत्रज्ञान उद्योगांमध्ये वापरले जाते, तेव्हा रॉयल्टीद्वारे खूपच चांगले पैसे हे संशोधक/ शास्त्रज्ञांना मिळतात. यामुळे चांगल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांमधून संशोधक/ शास्त्रज्ञ घडणं आवश्यक आहे. चांगले संशोधक वा शास्त्रज्ञ इंजिनीअर्स वा डॉक्टर्सच्या कैकपटीने पैसे मिळवू शकतात. यामुळेच विज्ञान शाखेतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना मुलभूत संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे इन्स्पायर स्कॉलरशिप ( इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूएट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च- INSPIRE) सुरु करण्यात आली. या स्कॉलरशिपचा उद्देश हा विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासून विज्ञानातील अभ्यासाची गोडी लावून संशोधनवृत्ती वाढीला लावण्याचा आहे. यामुळेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देशात निर्माण होईल.
या स्कॉलरशिप अंतर्गत देशामध्ये मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या साधारणत: १०,००० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते. या स्कॉलरशिपसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
१) राज्यांच्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पहिले एक टक्के विद्यार्थी ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससीला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात. इंजिनीअरिंग, मेडिकल वा इतर उपयोजित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र नसतात.
२) जे.ई.ई.(अॅडव्हान्स), जे.ई.ई.(मेन) तसेच एन.ई.ई.टी. या प्रवेश परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहा हजार जणांमध्ये असलेले व ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससी.ला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात.
३) आयसर (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च), नायसर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च), डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी-सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (मुंबई विद्यापीठ) या ठिकाणी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एन.टी.एस.ई.), जगदीश बोस नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलर्स, तसंच सायन्स ऑलम्पियाड पदक विजेते ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससीला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात.
या स्कॉलरशिप संदर्भातील अधिक माहितीसाठी http://www.online-inspire.gov.in/ ही वेबसाइट पहावी किंवा आपल्या महाविद्यालयात चौकशी करावी.
बारावी विज्ञानशाखेत चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाभाविकपणे इंजिनीअरिंग वा वैद्यकीय अभ्यासक्रमांकडे असतो. मुलभूत विज्ञानशाखांमध्ये देखील चांगले करिअर करता येईल याची जाणीव विद्यार्थी व पालकांमध्ये नसते. परिणामत: विज्ञानशाखेच्या विविध विषयांमध्ये चांगली प्रतिभा असलेले विद्यार्थी हे इंजिनीअरिंग वा वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी पूर्ण करुन एखादी चांगली नोकरी मिळवण्यातच समाधान मानतात. यामधील अपवादात्मक विद्यार्थीच संशोधनाच्या वाटेवर वळताना दिसतात. संशोधन स्थानिक वा जागतिक गरजेच्या दिशेने केल्यास त्यातून चांगली संपत्ती निर्माण होते. या संशोधनावर आधारीत तंत्रज्ञान उद्योगांमध्ये वापरले जाते, तेव्हा रॉयल्टीद्वारे खूपच चांगले पैसे हे संशोधक/ शास्त्रज्ञांना मिळतात. यामुळे चांगल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांमधून संशोधक/ शास्त्रज्ञ घडणं आवश्यक आहे. चांगले संशोधक वा शास्त्रज्ञ इंजिनीअर्स वा डॉक्टर्सच्या कैकपटीने पैसे मिळवू शकतात. यामुळेच विज्ञान शाखेतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना मुलभूत संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे इन्स्पायर स्कॉलरशिप ( इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूएट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च- INSPIRE) सुरु करण्यात आली. या स्कॉलरशिपचा उद्देश हा विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाच्या सुरुवातीपासून विज्ञानातील अभ्यासाची गोडी लावून संशोधनवृत्ती वाढीला लावण्याचा आहे. यामुळेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक ते मनुष्यबळ देशात निर्माण होईल.
या स्कॉलरशिप अंतर्गत देशामध्ये मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या साधारणत: १०,००० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते. या स्कॉलरशिपसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
१) राज्यांच्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पहिले एक टक्के विद्यार्थी ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससीला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात. इंजिनीअरिंग, मेडिकल वा इतर उपयोजित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र नसतात.
२) जे.ई.ई.(अॅडव्हान्स), जे.ई.ई.(मेन) तसेच एन.ई.ई.टी. या प्रवेश परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहा हजार जणांमध्ये असलेले व ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससी.ला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात.
३) आयसर (इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च), नायसर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च), डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी-सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (मुंबई विद्यापीठ) या ठिकाणी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एन.टी.एस.ई.), जगदीश बोस नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलर्स, तसंच सायन्स ऑलम्पियाड पदक विजेते ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससीला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात.
या स्कॉलरशिप संदर्भातील अधिक माहितीसाठी http://www.online-inspire.gov.in/ ही वेबसाइट पहावी किंवा आपल्या महाविद्यालयात चौकशी करावी.