वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेले जवळपास १५ टक्के विद्यार्थी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बेपत्ता असून ते पर्यायी ऑनलाइन वर्गातही उपस्थित राहत नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. त्यांना यंत्रणेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांचा प्रत्यक्ष किंवा फोनवर शोध लागण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
आम्ही पूर्ण क्षमतेने ऑनलाइन किंवा फोनद्वारे शिक्षणाचे धडे देत आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची सूचना शिक्षकांना देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५ टक्के विद्यार्थ्यांचा माग काढता आलेला नाही. ते त्यांच्या शाळांच्या संपर्कात नाहीत आणि त्यामुळे ते ऑनलाइन वर्गात उपस्थित राहत नाहीत, असेही सिसोदिया यांनी सांगितले. 'मी स्वत: याची फेरपडताळणी करत आहे. आम्हाला काही विद्यार्थ्यांचा शोध लागला आहे. काही विद्यार्थी शाळेकडे दिलेल्या पत्त्यावर राहतच नाहीत किंवा आमच्याकडे नोंद असलेले त्यांचे फोन नंबर लागत नाहीत. शाळा व्यवस्थापन समित्यांनी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास मदत करायला हवी, अशी सूचनाही मी दिली आहे. काही विद्यार्थी उत्तराखंड आणि बिहारसारख्या ठिकाणी गेले आहेत, पण ते आमच्या संपर्कात आहेत. ते वर्गात उपस्थित राहत असून शाळेने दिलेला अभ्यास करत आहेत', असेही ते म्हणाले.
यूपीएससी एनडीए एनए परीक्षेचे प्रवेशपत्र जारी
बेपत्ता विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती, याबाबत विचारले असता सिसोदिया म्हणाले, 'या वर्गवारीत प्रत्येक इयत्तेतील सरासरी चार-पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील अनेक विद्यार्थी सहावीतील आहेत. इतर इयत्तांमधील ही संख्या कमी आहे.' ११००हून अधिक दिल्ली सरकारी शाळांमध्ये जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ६ एप्रिलपासून आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. नर्सरी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य आणि उपक्रम व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर पाठवत आहोत, असे शिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेले जवळपास १५ टक्के विद्यार्थी लॉकडाउन जाहीर झाल्यापासून बेपत्ता असून ते पर्यायी ऑनलाइन वर्गातही उपस्थित राहत नाहीत, अशी माहिती उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. त्यांना यंत्रणेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांचा प्रत्यक्ष किंवा फोनवर शोध लागण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
आम्ही पूर्ण क्षमतेने ऑनलाइन किंवा फोनद्वारे शिक्षणाचे धडे देत आहोत आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याची सूचना शिक्षकांना देण्यात आली आहे. आत्तापर्यंत १५ टक्के विद्यार्थ्यांचा माग काढता आलेला नाही. ते त्यांच्या शाळांच्या संपर्कात नाहीत आणि त्यामुळे ते ऑनलाइन वर्गात उपस्थित राहत नाहीत, असेही सिसोदिया यांनी सांगितले. 'मी स्वत: याची फेरपडताळणी करत आहे. आम्हाला काही विद्यार्थ्यांचा शोध लागला आहे. काही विद्यार्थी शाळेकडे दिलेल्या पत्त्यावर राहतच नाहीत किंवा आमच्याकडे नोंद असलेले त्यांचे फोन नंबर लागत नाहीत. शाळा व्यवस्थापन समित्यांनी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास मदत करायला हवी, अशी सूचनाही मी दिली आहे. काही विद्यार्थी उत्तराखंड आणि बिहारसारख्या ठिकाणी गेले आहेत, पण ते आमच्या संपर्कात आहेत. ते वर्गात उपस्थित राहत असून शाळेने दिलेला अभ्यास करत आहेत', असेही ते म्हणाले.
यूपीएससी एनडीए एनए परीक्षेचे प्रवेशपत्र जारी
बेपत्ता विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती, याबाबत विचारले असता सिसोदिया म्हणाले, 'या वर्गवारीत प्रत्येक इयत्तेतील सरासरी चार-पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील अनेक विद्यार्थी सहावीतील आहेत. इतर इयत्तांमधील ही संख्या कमी आहे.' ११००हून अधिक दिल्ली सरकारी शाळांमध्ये जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ६ एप्रिलपासून आम्ही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. नर्सरी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना ई-लर्निंग साहित्य आणि उपक्रम व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर पाठवत आहोत, असे शिक्षण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.