मुंबई:
दहावीच्या मराठीच्या पेपरमध्ये चांगली कामगिरी करावी, याबाबत रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलच्या मराठी विभागप्रमुख नीता खोत यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन. दहावीच्या परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास काळजीने करावा. पाठ्यपुस्तकातील पाठांचा, कवितांचा बारकाईने सराव करावा. पाठातील कठीण शब्द व वाक्प्रचारांचा अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. कृतिपत्रिकेचा नवीन बदललेला आराखडा सरावाने पक्का झाला असेल. गद्य विभागातील परिच्छेदांवर आधारित कृती आणि स्वमत सोडवायचे असल्याने गद्यपाठ सर्व बारकाव्यांसह माहिती असणे आवश्यक आहे. आकलनकृती पेनानेच सोडवाव्यात. स्वमताकरिता तीन गुण असल्याने प्रथम पाठाची प्रस्तावना, पाठाचा विचारलेल्या स्वमताच्या अनुषंगाने केलेला उल्लेख आणि नंतर स्वमताचा विचार मांडणे असे तीन टप्प्यात लेखन करावे.
व्याकरणातील कृती पाठावर, पाठातील वाक्ये, शब्द, सामासिक शब्द, वाक्प्रचार विचारले जातात. त्यामुळे गद्यपाठांचा अभ्यास या सर्वांगाने करणे उचित ठरेल. कवितेवरील कृती असताना शब्दांचे अर्थ, भावार्थ, काव्यसौंदर्य या सर्वांचा अभ्यास असावा. अपठित उतारा हा तुलनेने सोडविणे सोपे जाते. चार गुणांच्या कृती योग्य पद्धतीने सोडवाव्यात, ज्यामुळे चुका टाळता येतील. कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, सरळ अर्थ, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे यांविषयी सविस्तर लेखन करावे. काव्यपंक्तींचे रसग्रहण करताना संदर्भ थोडक्यात सांगून कविताचा गाभा व भाषिक वैशिष्ट्ये यावर अधिक भर द्यावा.
व्याकरणात समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, विरामचिन्हे, लेखननियम, पारिभाषिक शब्द यांची अधिकाधिक उदाहरणे सोडवून बघावीत. पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात, बातमी आणि कथा वेगवेगळे घटक असल्याने त्यांच्या नियमानुसारच नवीन पानावर योग्य मांडणी करावी. उपयोजित लेखनातील विविध प्रकारांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे लेखन केल्यास चांगले गुण मिळू शकतात. मराठीच्या पेपरचे आणि एकंदरच परीक्षेचे अनावश्यक दडपण घेऊ नका. तयारीने आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिल्यास यश मिळणारच आहे याची खात्री बाळगा. ऑल द बेस्ट..
थोडी काळजी घ्या...
- प्रत्येक विभाग सुरू करताना उत्तरपत्रिकेच्या नव्या पानावर लिहावा.
- उत्तरपत्रिकेतून नीटनेटकेपणा राखला जावा.
- शब्दांच्या कोणत्याही व्याकरणाच्या चुका व्हायला नको.
- मराठीच्या बाबतीत शुद्धता, ऱ्हस्व आणि दीर्घ, नीट अक्षरे यांच्याकडे लक्ष द्यावे.
- निबंधांत म्हणींचा, सुविचारांचा, कवितांच्या ओळींचा उल्लेख करावा.
दहावीच्या मराठीच्या पेपरमध्ये चांगली कामगिरी करावी, याबाबत रामदासपेठ येथील सोमलवार हायस्कूलच्या मराठी विभागप्रमुख नीता खोत यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन. दहावीच्या परीक्षेसाठी मराठी विषयाचा अभ्यास काळजीने करावा. पाठ्यपुस्तकातील पाठांचा, कवितांचा बारकाईने सराव करावा. पाठातील कठीण शब्द व वाक्प्रचारांचा अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. कृतिपत्रिकेचा नवीन बदललेला आराखडा सरावाने पक्का झाला असेल. गद्य विभागातील परिच्छेदांवर आधारित कृती आणि स्वमत सोडवायचे असल्याने गद्यपाठ सर्व बारकाव्यांसह माहिती असणे आवश्यक आहे. आकलनकृती पेनानेच सोडवाव्यात. स्वमताकरिता तीन गुण असल्याने प्रथम पाठाची प्रस्तावना, पाठाचा विचारलेल्या स्वमताच्या अनुषंगाने केलेला उल्लेख आणि नंतर स्वमताचा विचार मांडणे असे तीन टप्प्यात लेखन करावे.
व्याकरणातील कृती पाठावर, पाठातील वाक्ये, शब्द, सामासिक शब्द, वाक्प्रचार विचारले जातात. त्यामुळे गद्यपाठांचा अभ्यास या सर्वांगाने करणे उचित ठरेल. कवितेवरील कृती असताना शब्दांचे अर्थ, भावार्थ, काव्यसौंदर्य या सर्वांचा अभ्यास असावा. अपठित उतारा हा तुलनेने सोडविणे सोपे जाते. चार गुणांच्या कृती योग्य पद्धतीने सोडवाव्यात, ज्यामुळे चुका टाळता येतील. कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, सरळ अर्थ, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे यांविषयी सविस्तर लेखन करावे. काव्यपंक्तींचे रसग्रहण करताना संदर्भ थोडक्यात सांगून कविताचा गाभा व भाषिक वैशिष्ट्ये यावर अधिक भर द्यावा.
व्याकरणात समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, विरामचिन्हे, लेखननियम, पारिभाषिक शब्द यांची अधिकाधिक उदाहरणे सोडवून बघावीत. पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात, बातमी आणि कथा वेगवेगळे घटक असल्याने त्यांच्या नियमानुसारच नवीन पानावर योग्य मांडणी करावी. उपयोजित लेखनातील विविध प्रकारांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यांचा अभ्यास करून योग्य प्रकारे लेखन केल्यास चांगले गुण मिळू शकतात. मराठीच्या पेपरचे आणि एकंदरच परीक्षेचे अनावश्यक दडपण घेऊ नका. तयारीने आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिल्यास यश मिळणारच आहे याची खात्री बाळगा. ऑल द बेस्ट..
थोडी काळजी घ्या...
- प्रत्येक विभाग सुरू करताना उत्तरपत्रिकेच्या नव्या पानावर लिहावा.
- उत्तरपत्रिकेतून नीटनेटकेपणा राखला जावा.
- शब्दांच्या कोणत्याही व्याकरणाच्या चुका व्हायला नको.
- मराठीच्या बाबतीत शुद्धता, ऱ्हस्व आणि दीर्घ, नीट अक्षरे यांच्याकडे लक्ष द्यावे.
- निबंधांत म्हणींचा, सुविचारांचा, कवितांच्या ओळींचा उल्लेख करावा.