म. टा. प्रतिनिधी, नाशिक पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांसमोर, आता पुढे काय, हा प्रश्न उभा ठाकला आहे. नोकरीच्या संधी आणि शिक्षणाच्या संधीही मिळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. करोनामुळे या विद्यार्थ्यांचे करिअरच धोक्यात आल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षभरापासून करोनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा, महायविद्यालयीन विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट, तसेच ऑनलाइन कामाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या भविष्याची चिंता सतावत आहे. शैक्षणिक नियोजन कोलमडल्यामुळे पुढील शिक्षणही घेता येत नाही आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे. एमए इंग्लिश केल्यानंतर 'सेट'ची तयारी करत होते; परंतु करोनामुळे अभ्यासिका, तसेच कॉलेजच्या लायब्ररीमध्येही जाता आले नाही. त्यामुळे परीक्षेची तयारीच करू न शकल्याचे मेघना यादवने सांगितले. जर्नालिझममधील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या अखिलेश अहिरेला गेल्या आठ महिन्यांपासून नोकरीची संधीच मिळालेली नाही. त्यामुळे पुढे काय करायचे, हाच प्रश्न असल्याचे अखिलेश म्हणाला.
गेल्या वर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षेत कम्प्युटर इंजिनीअरिंग ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊनही नोकरीची संधी न मिळाल्याचे यशश्री काटकरने सांगितले. कॅम्पस प्लेसमेंटसाठी मुलाखती घेण्यातही यंदा कंपन्यांनी कमी प्रतिसाद दिल्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात असल्याचे यशश्रीने सांगितले. एमबीए पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षापासून नोकरी शोधत असून, अद्याप नोकरी न मिळाल्याची माहिती प्रसन्न गिरासे या तरुणाने दिली. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असल्या, तरी अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मात्र नोकरी आणि पुढील शिक्षण अशा दोन्ही संधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. करोनामुळे त्यांच्या करिअरलाच ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय?
नववी, अकरावीचे मूल्यमापन करा; मात्र वर्गोन्नती आवश्यक
गेल्या वर्षभरापासून करोनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा, महायविद्यालयीन विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाइन शिक्षण मिळत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट, तसेच ऑनलाइन कामाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सध्या भविष्याची चिंता सतावत आहे. शैक्षणिक नियोजन कोलमडल्यामुळे पुढील शिक्षणही घेता येत नाही आणि नोकरीच्या संधीही उपलब्ध नाहीत, अशी त्यांची अवस्था झाली आहे. एमए इंग्लिश केल्यानंतर 'सेट'ची तयारी करत होते; परंतु करोनामुळे अभ्यासिका, तसेच कॉलेजच्या लायब्ररीमध्येही जाता आले नाही. त्यामुळे परीक्षेची तयारीच करू न शकल्याचे मेघना यादवने सांगितले. जर्नालिझममधील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या अखिलेश अहिरेला गेल्या आठ महिन्यांपासून नोकरीची संधीच मिळालेली नाही. त्यामुळे पुढे काय करायचे, हाच प्रश्न असल्याचे अखिलेश म्हणाला.
गेल्या वर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षेत कम्प्युटर इंजिनीअरिंग ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण होऊनही नोकरीची संधी न मिळाल्याचे यशश्री काटकरने सांगितले. कॅम्पस प्लेसमेंटसाठी मुलाखती घेण्यातही यंदा कंपन्यांनी कमी प्रतिसाद दिल्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात असल्याचे यशश्रीने सांगितले. एमबीए पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षापासून नोकरी शोधत असून, अद्याप नोकरी न मिळाल्याची माहिती प्रसन्न गिरासे या तरुणाने दिली. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या असल्या, तरी अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मात्र नोकरी आणि पुढील शिक्षण अशा दोन्ही संधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. करोनामुळे त्यांच्या करिअरलाच ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय?
नववी, अकरावीचे मूल्यमापन करा; मात्र वर्गोन्नती आवश्यक