म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात नवसंजीवनी मिळालेल्या औषधनिर्माणशास्त्र अर्थात फार्मसीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या क्षेत्रात होत असलेली गुंतवणूक आणि निर्माण होणाऱ्या संधी लक्षात घेता, यंदा त्यांनी या अभ्यासक्रमाला पसंती दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तंत्रशिक्षण संचलनालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डीफार्म अभ्यासक्रमाला जागांच्या तुलनेत चार पट जास्त अर्ज आल्याचे समोर आले आहे.
मागील काही वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. असे असले तरी दरवर्षी पदवीच्या काही जागा रिक्त राहायच्या. यंदा पदवी प्रवेशपरीक्षेची निश्चित आकडेवारी अद्याप समजू शकली नसली तरी गतवर्षी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बीफार्मसाठी पाच हजार २४ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते, तर २०२०-२१मध्ये २६ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. करोनाकाळात औषधनिर्माणशास्त्रात वाढलेल्या संधी आणि या क्षेत्रात होणारी गुंतवणूक याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गतवर्षी राज्यात २७ नव्या संस्थांमध्ये हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तर काही संस्थांमध्ये जागाही वाढवून देण्यात आल्या होत्या. पदविका अभ्यासक्रमांना यंदाही मोठी मागणी आल्यामुळे २८ संस्थांना हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ६० विद्यार्थ्यांची प्रत्येकी एक तुकडी याप्रमाणे मान्यता मिळाल्यामुळे पदविकेच्या एकूण जागांमध्ये एक हजार ६८०ची भर पडली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. औषधांच्या दुकानांमध्ये पदविकाधारकांची नियुक्ती बंधनकाकर केल्यानंतर पदविका अभ्यासक्रमांची मागणी वाढली आहे. यावर्षी पदविका अभ्यासक्रमांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ८५ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५८ हजार ५१३ विद्यार्थ्यांची अर्ज निश्चित केले होते. यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आल्याने ही अर्जसंख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या नवीन कॉलेजांमध्ये औरंगाबादमधील १०, नाशिकमधील नऊ, पुण्यातील चार, मुंबईत तीन, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी एक इतक्या कॉलेजांचा समावेश आहे. १२वीनंतर पदवी शिक्षण घेण्याऐवजी १०वीनंतर पदविका शिक्षण घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत हातात रोजगार मिळावा या उद्देशाने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाहू लागले आहेत. पदविका मिळल्यानंतर नोकरी करताना पदवी शिक्षण घेणेही शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय निवडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या अभ्यासक्रमाबाबबत तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेली जनजागृती, त्याचबरोबर करोनाकाळात या क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी याकडे वळत आहेत.
- मंजिरी घरत, प्रभारी प्राचार्य, के. एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक, उल्हासनगर
मागील काही वर्षांपासून फार्मसी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. असे असले तरी दरवर्षी पदवीच्या काही जागा रिक्त राहायच्या. यंदा पदवी प्रवेशपरीक्षेची निश्चित आकडेवारी अद्याप समजू शकली नसली तरी गतवर्षी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात बीफार्मसाठी पाच हजार २४ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते, तर २०२०-२१मध्ये २६ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. करोनाकाळात औषधनिर्माणशास्त्रात वाढलेल्या संधी आणि या क्षेत्रात होणारी गुंतवणूक याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गतवर्षी राज्यात २७ नव्या संस्थांमध्ये हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तर काही संस्थांमध्ये जागाही वाढवून देण्यात आल्या होत्या. पदविका अभ्यासक्रमांना यंदाही मोठी मागणी आल्यामुळे २८ संस्थांना हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ६० विद्यार्थ्यांची प्रत्येकी एक तुकडी याप्रमाणे मान्यता मिळाल्यामुळे पदविकेच्या एकूण जागांमध्ये एक हजार ६८०ची भर पडली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून चांगली मागणी आहे. औषधांच्या दुकानांमध्ये पदविकाधारकांची नियुक्ती बंधनकाकर केल्यानंतर पदविका अभ्यासक्रमांची मागणी वाढली आहे. यावर्षी पदविका अभ्यासक्रमांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ८५ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५८ हजार ५१३ विद्यार्थ्यांची अर्ज निश्चित केले होते. यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आल्याने ही अर्जसंख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यंदा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या नवीन कॉलेजांमध्ये औरंगाबादमधील १०, नाशिकमधील नऊ, पुण्यातील चार, मुंबईत तीन, अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी एक इतक्या कॉलेजांचा समावेश आहे. १२वीनंतर पदवी शिक्षण घेण्याऐवजी १०वीनंतर पदविका शिक्षण घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत हातात रोजगार मिळावा या उद्देशाने विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाहू लागले आहेत. पदविका मिळल्यानंतर नोकरी करताना पदवी शिक्षण घेणेही शक्य होणार आहे. यामुळे विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाचा पर्याय निवडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या अभ्यासक्रमाबाबबत तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेली जनजागृती, त्याचबरोबर करोनाकाळात या क्षेत्रात निर्माण झालेल्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी याकडे वळत आहेत.
- मंजिरी घरत, प्रभारी प्राचार्य, के. एम. कुंदनानी फार्मसी पॉलिटेक्निक, उल्हासनगर