CBSE examination: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षेतील वादग्रस्त प्रश्नांसाठी जबाबदार असलेल्या पेपर सेटिंग पॅनलमधून दोन विषय तज्ञांना बडतर्फ केले आहे. बोर्डाने पेपर सेटिंग प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी माजी परीक्षा नियंत्रक पवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या टर्म १ बोर्ड परीक्षेत दोन मोठे वाद समोर आले होते. यादरम्यान बारावीच्या समाजशास्त्राच्या पेपरमधील प्रश्नावरुन वाद निर्माण झाला होता. सीबीएसई बोर्डाने हा प्रश्न अयोग्य असल्याचे म्हटले आणि पेपरमध्ये हा प्रश्न विचारणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. २००२ मध्ये गुजरातमध्ये कोणत्या सरकारच्या काळात मुस्लिमविरोधी दंगली झाल्या? असे बारावीच्या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आले होते. त्याच्या पर्यायात काँग्रेस, भाजप डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाची नावे देण्यात आली होती. ही बाब समोर येताच सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. याबाबत सीबीएसईने नंतर स्पष्टीकरणही जाहीर केले.
याशिवाय दहावीच्या इंग्रजी परीक्षेच्या पेपरबाबतही वाद झाला होता. पेपरमध्ये आकलनाचा उतारा आणि त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. 'स्त्रियांच्या स्वातंत्र्यामुळे मुलांवरील पालकांचा अधिकार नाहीसा झाला आहे का?' घरामध्ये महिलांना जास्त अधिकार मिळाल्याने मुलं बिघडू लागली आहेत का? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
या प्रकरणामुळे वाद उद्भवल्यानंतर सीबीएसईने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. 'बारावीच्या समाजशास्त्राच्या टर्म १ परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला आहे. जो अयोग्य असल्याचे बोर्डाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सीबीएसईच्या बाह्य विषय तज्ञांना पेपर सेट करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे यात म्हटले आहे. सीबीएसईने ही चूक मान्य केली असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय दहावीच्या इंग्रजी परीक्षेच्या पेपरबाबतही वाद झाला होता. पेपरमध्ये आकलनाचा उतारा आणि त्याच्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. 'स्त्रियांच्या स्वातंत्र्यामुळे मुलांवरील पालकांचा अधिकार नाहीसा झाला आहे का?' घरामध्ये महिलांना जास्त अधिकार मिळाल्याने मुलं बिघडू लागली आहेत का? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
या प्रकरणामुळे वाद उद्भवल्यानंतर सीबीएसईने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. 'बारावीच्या समाजशास्त्राच्या टर्म १ परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला आहे. जो अयोग्य असल्याचे बोर्डाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सीबीएसईच्या बाह्य विषय तज्ञांना पेपर सेट करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे यात म्हटले आहे. सीबीएसईने ही चूक मान्य केली असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.