Hiding Information: कोणत्याही कर्मचाऱ्याने कंपनीला खोटी माहिती दिल्या थेट त्याच्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो. कर्मचाऱ्याच्या या चुकीमुळे कंपनी त्याला बडतर्फ करू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पोलीस दलातील भरतीच्या बाबतीत कायद्याची तत्त्वे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. त्यानुसार, लोकांच्या आत्मविश्वासाला प्रेरित करण्याची त्यांची क्षमता ही समाजाच्या सुरक्षिततेसाठी एक ढाल आहे. कंपनीला कर्मचाऱ्याच्या भूतकाळातील नोंदी तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशी अनेक प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची असते. त्याच्यावर फौजदारी खटले सुरु असतात. अशावेळी त्या कर्मचाऱ्याबद्दल पूर्ण माहिती मिळविण्याचा अधिकार कंपनीला आहे. त्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवर किंवा सेवेवर ठेवण्यापूर्वी त्याचे मागील रेकॉर्ड तपासले जाऊ शकतात.
कर्मचाऱ्याने खोटी माहिती दिल्याचे तसेच, माहिती लपविल्याचे आढळल्यास कपंनीकडे कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.
काय काळजी घ्याल?
जगावर मंदीचे वातावरण घोंघावत असल्याने अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. कर्मचाऱ्यांना मोठा पगार देणे अनेक कंपन्यांना परवडेनासे झाले आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनी कळत नकळत केलेली एक चूक त्यांना महागात पडू शकते. यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले काम चांगले ठेवण्यासोबतच कंपनीला चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
नोकरीला रुजू होण्यापुर्वी जोडलेली कागदपत्रे खोटी, चुकीची नसतील याची खात्री करावी.
आधीच्या कंपनीत काम केल्याचा एकूण अनुभव, कंपनीची माहिती, रेफरन्सचे नाव आणि अनुभव अशी माहिती मागितली जाते. कंपन्यांकडून या माहितीची पडताळणी देखील केली जाते. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे लक्षात असू द्या.
कर्मचाऱ्याने खोटी माहिती दिल्याचे तसेच, माहिती लपविल्याचे आढळल्यास कपंनीकडे कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.
काय काळजी घ्याल?
जगावर मंदीचे वातावरण घोंघावत असल्याने अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. कर्मचाऱ्यांना मोठा पगार देणे अनेक कंपन्यांना परवडेनासे झाले आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनी कळत नकळत केलेली एक चूक त्यांना महागात पडू शकते. यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले काम चांगले ठेवण्यासोबतच कंपनीला चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
नोकरीला रुजू होण्यापुर्वी जोडलेली कागदपत्रे खोटी, चुकीची नसतील याची खात्री करावी.
आधीच्या कंपनीत काम केल्याचा एकूण अनुभव, कंपनीची माहिती, रेफरन्सचे नाव आणि अनुभव अशी माहिती मागितली जाते. कंपन्यांकडून या माहितीची पडताळणी देखील केली जाते. त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे लक्षात असू द्या.