Final Year Exam 2020: पदवी परीक्षा कशा पद्धतीने आयोजित करायच्या याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग बुधवार २ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत अंतिम निर्णयापर्यंत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी ११ वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यांना पदवी परीक्षांसंदर्भातील राज्य सरकार करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतचे निर्देश दिल्यानंतर त्यास बांधील राहून राज्यात पदवी परीक्षा रद्द न करता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रापर्यंत जावे लागणार नाही, हेही यापूर्वी उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही,अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती देखील यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यपालांना देणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती आज सायंकाळी पुन्हा बैठक होणार आहे. यात समिती आपल्या अंतिम शिफारशींचा दुसरा प्रस्ताव उदय सामंत यांना सादर करणार आहे. शिवाय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचीदेखील आज बैठक होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी परीक्षा घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र राज्यातील मुंबई, पुणे सह अनेक विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीत या मुदतवाढीबाबत चर्चा होऊन प्रस्ताव तयार केला जाईल आणि तो विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी सोमवारी दिली आहे.
विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा घरबसल्या देता येणार; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई, नीटला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
राज्यात एकूण ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा आयोजित करायची आहे. ही संख्या खूप मोठी असल्याने विद्यापीठांना मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आज यूजीसीला केली जाणार आहे. दरम्यान, पदवी परीक्षांचे स्वरुप कसे असेल त्याबाबतचे चित्रही आज स्पष्ट होईल.
सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्यासह राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही,अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती देखील यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यपालांना देणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती आज सायंकाळी पुन्हा बैठक होणार आहे. यात समिती आपल्या अंतिम शिफारशींचा दुसरा प्रस्ताव उदय सामंत यांना सादर करणार आहे. शिवाय आपत्कालीन व्यवस्थापन समितीचीदेखील आज बैठक होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी परीक्षा घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र राज्यातील मुंबई, पुणे सह अनेक विद्यापीठांनी परीक्षा आयोजित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन समितीत या मुदतवाढीबाबत चर्चा होऊन प्रस्ताव तयार केला जाईल आणि तो विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती उदय सामंत यांनी सोमवारी दिली आहे.
विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा घरबसल्या देता येणार; उच्च शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
विदर्भातील पूरसदृश स्थितीमुळे जेईई, नीटला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
राज्यात एकूण ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची पदवी परीक्षा आयोजित करायची आहे. ही संख्या खूप मोठी असल्याने विद्यापीठांना मुदतवाढ द्यावी, अशी विनंती आज यूजीसीला केली जाणार आहे. दरम्यान, पदवी परीक्षांचे स्वरुप कसे असेल त्याबाबतचे चित्रही आज स्पष्ट होईल.