नवी दिल्ली: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशक यांनी शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, 'कोविड १९ महामारीच्या काळात परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने गृहमंत्रालयाच्या सहकार्याने विस्तृत स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केले आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे SOP तयार केले आहे.'
'विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य, सुरक्षितता, न्याय आणि परीक्षेसाठी समान संधी देणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. शैक्षणिक विश्वासार्हता, करिअरच्या संधी आणि विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती महत्त्वाची आहे,' असे पोखरियाल म्हणाले.
करोनाच्या देशातील वाढत्या संसर्गामुले २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. तेव्हापासून देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत की अनलॉक १ च्या दुसऱ्या टप्प्यात राज्यांशी आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्था सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; रद्द केल्या सर्व परीक्षा
पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनीही लिहिले एमएचआरडी, यूजीसीला पत्र
दरम्यान, पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना जी सुधारित मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, त्यांचा पुन्हा एकवार अभ्यास करावा, अशी विनंती बाजवा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार, देशातील सर्व विद्यापीठांनी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र अखेर परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घ्यायच्या आहेत. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना यूजीसीने ही मार्गदर्शक तत्वे पाठवली आहेत. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोविड - १९ च्या गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारला कळवलं. आहे. शनिवारी ११ जुलै रोजी दिल्ली सरकारनेही राज्यातल्या सर्व विद्यापीठ परीक्षा रद्द केल्या आहेत.
महाराष्ट्रात पदवी परीक्षा घेणे शक्य नाही; उच्च शिक्षणमंत्र्यांचा पुनरुच्चार
दिल्ली सरकारने केल्या परीक्षा रद्द
कोविड महारामीच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्याय्य होईल असे सांगत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. एकाही विद्यापीठात कोणतीही अंतरिम किंवा अंतिम परीक्षा होणार नाही. महामारी काळामुळे शिकू न शकलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आप सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असेही सिसोदिया म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निर्णयाबाबत कळवले आहे. शिवाय जो निर्णय दिल्ली सरकारने घेतला तोच केंद्र सरकारने घ्यावा अशी विनंतीही केली आहे.
'विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य, सुरक्षितता, न्याय आणि परीक्षेसाठी समान संधी देणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. शैक्षणिक विश्वासार्हता, करिअरच्या संधी आणि विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती महत्त्वाची आहे,' असे पोखरियाल म्हणाले.
करोनाच्या देशातील वाढत्या संसर्गामुले २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. तेव्हापासून देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्देश दिले आहेत की अनलॉक १ च्या दुसऱ्या टप्प्यात राज्यांशी आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर शाळा, कॉलेज आणि अन्य शैक्षणिक संस्था सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; रद्द केल्या सर्व परीक्षा
पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनीही लिहिले एमएचआरडी, यूजीसीला पत्र
दरम्यान, पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना जी सुधारित मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, त्यांचा पुन्हा एकवार अभ्यास करावा, अशी विनंती बाजवा यांनी या पत्राद्वारे केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार, देशातील सर्व विद्यापीठांनी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र अखेर परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घ्यायच्या आहेत. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना यूजीसीने ही मार्गदर्शक तत्वे पाठवली आहेत. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोविड - १९ च्या गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारला कळवलं. आहे. शनिवारी ११ जुलै रोजी दिल्ली सरकारनेही राज्यातल्या सर्व विद्यापीठ परीक्षा रद्द केल्या आहेत.
महाराष्ट्रात पदवी परीक्षा घेणे शक्य नाही; उच्च शिक्षणमंत्र्यांचा पुनरुच्चार
दिल्ली सरकारने केल्या परीक्षा रद्द
कोविड महारामीच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांसाठी अन्याय्य होईल असे सांगत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. एकाही विद्यापीठात कोणतीही अंतरिम किंवा अंतिम परीक्षा होणार नाही. महामारी काळामुळे शिकू न शकलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आप सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे, असेही सिसोदिया म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निर्णयाबाबत कळवले आहे. शिवाय जो निर्णय दिल्ली सरकारने घेतला तोच केंद्र सरकारने घ्यावा अशी विनंतीही केली आहे.