यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी
करोनाच्या संसर्गामुळे विद्यापीठ परीक्षा रखडल्या होत्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. आता केंद्र सरकारने विद्यापीठांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2020, 10:22 pm
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षा खोळंबल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने या परीक्षांना परवानगी दिली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षा घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यापीठ परीक्षा रखडल्या होत्या. पण देशातील लॉकडाऊन खोलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात आता अनलॉक दोनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार केंद्र सरकारकडून अनेक गोष्टांना परवानगी देण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिली आहे. पण यासाठी विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात विद्यापीठ परीक्षांना परवानगी देण्यातय येत असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता केंद्र सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना परवानगी दिली आहे. यासंदर्भात यूजीसीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यूजीसीने विद्यापीठ परीक्षांसाठी २९ एप्रिल २०२० ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठांना आणि संस्थाना परीक्षा नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी लगबग करावी लागणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिल्यानंतर यूजीसीने परीक्षांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...
दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही यूजीसीला परीक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत फेरविचार करण्यास सांगितलं होतं. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गदर्शक सूचना असाव्यात, असं पोखरियाल यांनी सांगितलं होतं.
यूजीसीची सोमवारी बैठक झाली. सप्टेंबर अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या किंवा शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना देण्यात याव्यात, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या किंवा पदवीच्या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अथवा दोन्ही पद्धतीचा उपयोग करून घ्याव्यात, असं यूजीसीने जारी केलेल्या २९ एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय. तसंच प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षाच्या किंवा गेल्या सेमिस्टरच्या गुणांच्या पुढच्या वर्गात पाठवावे, असं यूजीसीने म्हटलंय.
करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यूजीसीने यंदाचे शैक्षणिक वर्ष हे १ वर्षापासून सुरू करण्यास सांगितलं आहे. ज्यांचे आधीच प्रवेश झाला आहे त्याचे शैक्षणिक वर्ष हे १ ऑगस्टपासून सुरू होईल, असं यूजीने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय.
लॉकडाऊनमुळे विद्यापीठ परीक्षा रखडल्या होत्या. पण देशातील लॉकडाऊन खोलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात आता अनलॉक दोनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार केंद्र सरकारकडून अनेक गोष्टांना परवानगी देण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिली आहे. पण यासाठी विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात विद्यापीठ परीक्षांना परवानगी देण्यातय येत असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता केंद्र सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना परवानगी दिली आहे. यासंदर्भात यूजीसीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यूजीसीने विद्यापीठ परीक्षांसाठी २९ एप्रिल २०२० ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठांना आणि संस्थाना परीक्षा नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी लगबग करावी लागणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिल्यानंतर यूजीसीने परीक्षांसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे...
दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही यूजीसीला परीक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत फेरविचार करण्यास सांगितलं होतं. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गदर्शक सूचना असाव्यात, असं पोखरियाल यांनी सांगितलं होतं.
यूजीसीची सोमवारी बैठक झाली. सप्टेंबर अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या किंवा शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा घ्याव्यात अशा सूचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना देण्यात याव्यात, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या किंवा पदवीच्या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन अथवा दोन्ही पद्धतीचा उपयोग करून घ्याव्यात, असं यूजीसीने जारी केलेल्या २९ एप्रिलच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय. तसंच प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षाच्या किंवा गेल्या सेमिस्टरच्या गुणांच्या पुढच्या वर्गात पाठवावे, असं यूजीसीने म्हटलंय.
करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यूजीसीने यंदाचे शैक्षणिक वर्ष हे १ वर्षापासून सुरू करण्यास सांगितलं आहे. ज्यांचे आधीच प्रवेश झाला आहे त्याचे शैक्षणिक वर्ष हे १ ऑगस्टपासून सुरू होईल, असं यूजीने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय.