>> सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर
हल्ली सगळ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेत अव्वल येण्याची इच्छा असते. पण अशी इच्छा करताना या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपली तेवढी क्षमता आहे का, याचा विचारच करत नाही. पालकही आपल्या मुलांकडून मार्कांबाबत अशा अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मनावर याचं प्रचंड दडपण येऊ शकतं.
प्रत्येक घरात हल्ली परीक्षा म्हटंली की, वातावरण तणावाचं असतं; त्यात दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे आधिक काळजी आणि टेन्शन पाहायला मिळतं.
प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर गेल्यावर तर या मुलांवरील ताण आणखीनच वाढतो. या तणावाचा परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत प्रश्नपत्रिका पाहिल्यावर गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते. अनेकांना प्रश्नपत्रिकेतले प्रश्न अनोळखी वाटू लागतात (पहिल्यांदाच पाहिल्यासारखे), तर काही विद्यार्थ्यांना काय उत्तर लिहायचं हेच सुचत नाही. या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांवर असणारं परीक्षेचं टेन्शन. त्यातच आई-वडिलांच्याही मुलांकडून मार्कांबाबत खूप अपेक्षा असतात. परीक्षेच्या टेन्शनमुळे आणि इतर अपेक्षांमुळे हे विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि घाबरून जातात.
परीक्षेचं टेन्शन (एक्झाम अँक्झायटी) कुणाला आणि का येतं?
आतापर्यंत सगळ्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या मुलांना दहावी-बारावी किंवा ग्रॅज्युएशन यासारख्या महत्त्वाच्या टप्प्यावरील परीक्षांच्या वेळी थोडं अधिक टेन्शन येतं. नेहमीप्रमाणे आताही चांगले गुण मिळायला हवेत, ही इच्छा जशी असतेच, तशीच आई-वडिलांच्या अपेक्षेचं ओझंही यासाठी कारणीभूत आहे. परिणामी, त्यांच्या मनावर दडपण आणि ताण यायला सुरुवात होते.
ज्या मुलांना परीक्षेची काळजी वाटते. पण काही कारणास्तव परीक्षेची तयारी वेळेत केलेली नाही, अशा मुलांनाही परीक्षेचा ताण येतो. त्यातच पालकांचा सततचा ओरडा यामुळेही विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक दडपण येत असतं. परीक्षेची पूर्वतयारी वेळेत केलेली नसल्यास परीक्षेत अपेक्षे इतकं यश मिळणं अशक्य आहे. मुलांच्या मनावर आलेल्या ताणाला किंवा त्यांच्या मनातील नकारात्मक भावनेला 'परीक्षेची काळजी' किंवा 'परीक्षेचं दडपण' (एक्झाम अँक्झायटी) असं म्हटलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला येणारं परीक्षेचं टेन्शन वेगवेगळं असतं. काहीजण या काळात निराश होतात, तर काही जणांना ताप भरतो. काही जण खाणंपिणं सोडतात, तर काही जण सतत नकारात्मक बोलू लागतात.
परीक्षेच्या दडपणाची काही लक्षणं
नकारात्मक भावना : बऱ्याचदा मुलांच्या मनात 'मी अयशस्वी झालो तर..?', 'मला चांगले गुण मिळाले नाही तर...', 'मला परीक्षेत आठवलं नाही तर..?', 'आईबाबांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळाले नाही, तर...?', असे एक ना अनेक नकारात्मक विचार डोक्यात फिरत असतात. अशा नकारात्मक विचारांमुळे मुलांच्या मनावर प्रचंड ताण येतो.
वैद्यकीय समस्या उद्भवतात : काहीही कारण नसताना अचानक मुलांना ताप येऊ लागतो, सर्दी-खोकला किंवा श्वसनास अडथळा अशा वैद्यकीय समस्या उद्भवू लागतात. परीक्षा जवळ येते तेव्हा किंवा परीक्षा केंद्रावर चक्कर येणं, उलटी आल्यासारखं वाटणं किंवा मळमळणं अशा समस्या अनेकांना भेडसावू लागतात. या काळात मुलांना काही खाण्याचीही इच्छा होत नाही. परिणामी, अशक्तपणा आणि मानसिक दुर्बलता वाढीस लागते.
थरथरणं: परीक्षा जवळ येताच किंवा परीक्षा हॉलवर काही मुलांचे हातपार गार पडतात. काही आठवत नाही किंवा उत्तर लिहिताना हात थरथरणं अशा तक्रारी करणाऱ्या मुलांची संख्या या काळात वाढते.
ऐन परीक्षेत काहीच न आठवणं : मुलांना परीक्षा आणि निकालाचं एवढं टेन्शन येतं की, बऱ्याचदा ऐन परीक्षेत ही मुलं ब्लँक होऊन जातात. प्रश्नपत्रिकेतले प्रश्न त्यांना कळत नाहीत किंवा कळले तरी त्यांची उत्तर त्यांना आठवत नाही.
परीक्षेपूर्वी येणाऱ्या ताणतणावामुळे आणि भीतीमुळे मुलं नीट अभ्यास करत नाहीत. अशा मुलांमध्ये वरीलप्रमाणे परीक्षेच्या दडपणाची लक्षणं पाहायला मिळतात. पुढील लेखामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेचा बागुलबुवा कसा दूर करावा आणि तणावाचा सामना कसा करावा याबद्दल माहिती घेऊयात.
हल्ली सगळ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेत अव्वल येण्याची इच्छा असते. पण अशी इच्छा करताना या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण आपली तेवढी क्षमता आहे का, याचा विचारच करत नाही. पालकही आपल्या मुलांकडून मार्कांबाबत अशा अवास्तव अपेक्षा बाळगून असतात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मनावर याचं प्रचंड दडपण येऊ शकतं.
प्रत्येक घरात हल्ली परीक्षा म्हटंली की, वातावरण तणावाचं असतं; त्यात दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे आधिक काळजी आणि टेन्शन पाहायला मिळतं.
प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर गेल्यावर तर या मुलांवरील ताण आणखीनच वाढतो. या तणावाचा परिणाम म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेत प्रश्नपत्रिका पाहिल्यावर गरगरल्यासारखं होतं, चक्कर येते. अनेकांना प्रश्नपत्रिकेतले प्रश्न अनोळखी वाटू लागतात (पहिल्यांदाच पाहिल्यासारखे), तर काही विद्यार्थ्यांना काय उत्तर लिहायचं हेच सुचत नाही. या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांवर असणारं परीक्षेचं टेन्शन. त्यातच आई-वडिलांच्याही मुलांकडून मार्कांबाबत खूप अपेक्षा असतात. परीक्षेच्या टेन्शनमुळे आणि इतर अपेक्षांमुळे हे विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावून बसतात आणि घाबरून जातात.
परीक्षेचं टेन्शन (एक्झाम अँक्झायटी) कुणाला आणि का येतं?
आतापर्यंत सगळ्या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या मुलांना दहावी-बारावी किंवा ग्रॅज्युएशन यासारख्या महत्त्वाच्या टप्प्यावरील परीक्षांच्या वेळी थोडं अधिक टेन्शन येतं. नेहमीप्रमाणे आताही चांगले गुण मिळायला हवेत, ही इच्छा जशी असतेच, तशीच आई-वडिलांच्या अपेक्षेचं ओझंही यासाठी कारणीभूत आहे. परिणामी, त्यांच्या मनावर दडपण आणि ताण यायला सुरुवात होते.
ज्या मुलांना परीक्षेची काळजी वाटते. पण काही कारणास्तव परीक्षेची तयारी वेळेत केलेली नाही, अशा मुलांनाही परीक्षेचा ताण येतो. त्यातच पालकांचा सततचा ओरडा यामुळेही विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक दडपण येत असतं. परीक्षेची पूर्वतयारी वेळेत केलेली नसल्यास परीक्षेत अपेक्षे इतकं यश मिळणं अशक्य आहे. मुलांच्या मनावर आलेल्या ताणाला किंवा त्यांच्या मनातील नकारात्मक भावनेला 'परीक्षेची काळजी' किंवा 'परीक्षेचं दडपण' (एक्झाम अँक्झायटी) असं म्हटलं जातं. प्रत्येक विद्यार्थ्याला येणारं परीक्षेचं टेन्शन वेगवेगळं असतं. काहीजण या काळात निराश होतात, तर काही जणांना ताप भरतो. काही जण खाणंपिणं सोडतात, तर काही जण सतत नकारात्मक बोलू लागतात.
परीक्षेच्या दडपणाची काही लक्षणं
नकारात्मक भावना : बऱ्याचदा मुलांच्या मनात 'मी अयशस्वी झालो तर..?', 'मला चांगले गुण मिळाले नाही तर...', 'मला परीक्षेत आठवलं नाही तर..?', 'आईबाबांच्या अपेक्षेप्रमाणे चांगले गुण मिळाले नाही, तर...?', असे एक ना अनेक नकारात्मक विचार डोक्यात फिरत असतात. अशा नकारात्मक विचारांमुळे मुलांच्या मनावर प्रचंड ताण येतो.
वैद्यकीय समस्या उद्भवतात : काहीही कारण नसताना अचानक मुलांना ताप येऊ लागतो, सर्दी-खोकला किंवा श्वसनास अडथळा अशा वैद्यकीय समस्या उद्भवू लागतात. परीक्षा जवळ येते तेव्हा किंवा परीक्षा केंद्रावर चक्कर येणं, उलटी आल्यासारखं वाटणं किंवा मळमळणं अशा समस्या अनेकांना भेडसावू लागतात. या काळात मुलांना काही खाण्याचीही इच्छा होत नाही. परिणामी, अशक्तपणा आणि मानसिक दुर्बलता वाढीस लागते.
थरथरणं: परीक्षा जवळ येताच किंवा परीक्षा हॉलवर काही मुलांचे हातपार गार पडतात. काही आठवत नाही किंवा उत्तर लिहिताना हात थरथरणं अशा तक्रारी करणाऱ्या मुलांची संख्या या काळात वाढते.
ऐन परीक्षेत काहीच न आठवणं : मुलांना परीक्षा आणि निकालाचं एवढं टेन्शन येतं की, बऱ्याचदा ऐन परीक्षेत ही मुलं ब्लँक होऊन जातात. प्रश्नपत्रिकेतले प्रश्न त्यांना कळत नाहीत किंवा कळले तरी त्यांची उत्तर त्यांना आठवत नाही.
परीक्षेपूर्वी येणाऱ्या ताणतणावामुळे आणि भीतीमुळे मुलं नीट अभ्यास करत नाहीत. अशा मुलांमध्ये वरीलप्रमाणे परीक्षेच्या दडपणाची लक्षणं पाहायला मिळतात. पुढील लेखामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेचा बागुलबुवा कसा दूर करावा आणि तणावाचा सामना कसा करावा याबद्दल माहिती घेऊयात.