म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची? बहुपर्यायी प्रश्न द्यायचे की सविस्तर उत्तरे लिहिण्याची परीक्षा घ्यायची? याबाबत शिक्षण विभागाने कोणतेही मार्गदर्शन न केल्याने मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काही शाळांनी तोंडी परीक्षांचे नियोजन केले आहे, तर काही शाळांनी लेखी परीक्षांचे. यामुळे समान मूल्यमापन होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अंतिम वर्ष पदवी परीक्षेबाबत सरकारने विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र शालेय परीक्षांबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू आहे तर परीक्षाही ऑनलाइनच होणार, असे तोंडी आदेश दिले जात आहेत. ऑनलाइन परीक्षांसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक तयार आहेत, मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत समान सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रश्न देऊन त्याची सविस्तर उत्तरे लिहून ती अपलोड करण्यास सांगितली आहेत. तर, काही शाळांनी बहुपर्यायी स्वरूपात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले आहे. काही शाळांनी केवळ तोंडी परीक्षेच्या आधारेच मूल्यांकन केले आहे.
मात्र काही शाळा अद्याप मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करत आहेत. परिणामी सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण होते असे नाही. यामुळे सरकारने याबाबत सर्व समावेशक एकत्रित मार्गदर्शक सूचना काढव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. काही पालकांनीही याबाबत तक्रारी केल्या असून शाळांनी एकसमान परीक्षा घ्याव्यात, अशी पालकांची मागणी आहे.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग
शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करावे
दरवर्षी शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र यंदा ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र दिवाळी सुटी कधी व कशी असेल, पहिले सत्र कधी संपेल, याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शाळानिहाय वेळापत्रक बदलत आहे. तेव्हा विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची? बहुपर्यायी प्रश्न द्यायचे की सविस्तर उत्तरे लिहिण्याची परीक्षा घ्यायची? याबाबत शिक्षण विभागाने कोणतेही मार्गदर्शन न केल्याने मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. काही शाळांनी तोंडी परीक्षांचे नियोजन केले आहे, तर काही शाळांनी लेखी परीक्षांचे. यामुळे समान मूल्यमापन होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अंतिम वर्ष पदवी परीक्षेबाबत सरकारने विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र शालेय परीक्षांबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू आहे तर परीक्षाही ऑनलाइनच होणार, असे तोंडी आदेश दिले जात आहेत. ऑनलाइन परीक्षांसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक तयार आहेत, मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत समान सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांना प्रश्न देऊन त्याची सविस्तर उत्तरे लिहून ती अपलोड करण्यास सांगितली आहेत. तर, काही शाळांनी बहुपर्यायी स्वरूपात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले आहे. काही शाळांनी केवळ तोंडी परीक्षेच्या आधारेच मूल्यांकन केले आहे.
मात्र काही शाळा अद्याप मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा करत आहेत. परिणामी सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण होते असे नाही. यामुळे सरकारने याबाबत सर्व समावेशक एकत्रित मार्गदर्शक सूचना काढव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. काही पालकांनीही याबाबत तक्रारी केल्या असून शाळांनी एकसमान परीक्षा घ्याव्यात, अशी पालकांची मागणी आहे.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आता दूरदर्शनवर वर्ग
शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करावे
दरवर्षी शालेय शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र यंदा ऑनलाइन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र दिवाळी सुटी कधी व कशी असेल, पहिले सत्र कधी संपेल, याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शाळानिहाय वेळापत्रक बदलत आहे. तेव्हा विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून होत आहे.
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुन्हा पुढे ढकलल्या