HSC Result Update 2021: राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा जाहीर केला होता. त्यानुसार आता मूल्यांकन प्रक्रिया कशी राबवली जाणार याबाबतचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. बुधवार ७ जुलैपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरू करावयाचे आहे. हे काम २३ जुलैपर्यंत पूर्ण करावयाचे आहे, म्हणजेच बारावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही सर्व मंडळांना जुलैअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. कशी असेल मूल्यमापन प्रक्रिया?
कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्या दरम्यान, १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनिअर कॉलेजमध्ये एक सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत फीड केल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. गुण ऑनलाइन फीड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांनी ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विट केली आहे. बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करत गायकवाड यांनी मंडळाची लिंक पोस्ट केली आहे.
निकाल कोणत्या सूत्राने?
इयत्ता दहावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के वेटेज यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला असणार आहे. दहावीच्या वर्षांच्या गुणांचे वेटेज लक्षात घेताना सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत.
इयत्ता - मूल्यमापनाचा तपशील - भारांश
दहावी - इयत्ता दहावीतील बोर्ड परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण - ३० टक्के
अकरावी - इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण - ३० टक्के
बारावी - बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण - ४० टक्के
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
बारावी बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कनिष्ठ महाविद्यालयांनी ७ ते २३ जुलैपर्यंत अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्या दरम्यान, १४ ते २१ जुलै या कालावधीत मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरायचे आहेत. निकाल प्रमाणित करण्यासाठी प्रत्येक ज्युनिअर कॉलेजमध्ये एक सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने निकाल प्रमाणित केल्यानंतर आणि ते प्राचार्यांनी संगणकीय प्रणालीत फीड केल्यानंतर मंडळ स्तरावर अंतिम निकाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात होईल. गुण ऑनलाइन फीड केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांनी ते सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विट केली आहे. बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करत गायकवाड यांनी मंडळाची लिंक पोस्ट केली आहे.
निकाल कोणत्या सूत्राने?
इयत्ता दहावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के वेटेज यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला असणार आहे. दहावीच्या वर्षांच्या गुणांचे वेटेज लक्षात घेताना सर्वाधिक गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत.
इयत्ता - मूल्यमापनाचा तपशील - भारांश
दहावी - इयत्ता दहावीतील बोर्ड परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण - ३० टक्के
अकरावी - इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण - ३० टक्के
बारावी - बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय गुण - ४० टक्के
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
बारावी बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.